शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तालुका, ग्रामपंचायत सदस्यांना मताधिकार द्या

By admin | Updated: March 28, 2016 02:06 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्वंकष प्रतिनिधित्व विधान परिषदेत असावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समित्यांच्या

- चंद्रकांत कित्तुरे,  कोल्हापूरस्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्वंकष प्रतिनिधित्व विधान परिषदेत असावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समित्यांच्या सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटकात मताधिकार मिळतो, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवालही तालुका आणि ग्रामपंचायत सदस्यांमधून विचारला जात आहे.राज्यात विधान परिषदेची सदस्यसंख्या ७८ आहे. यात विधानसभा सदस्यांकडून निवडले जाणारे ३०, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जाणारे २२, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचे प्रत्येकी ७ आणि राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवार निवडून देण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. तालुका पंचायत समित्यांच्या केवळ सभापतींना या निवडणुकीत मतदान करता येते; मात्र तालुका पंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. राज्यात ३५५ तालुका पंचायत समित्या आहेत. त्यांचे ३९०६ सदस्य आहेत. २७,९२० ग्रामपंचायती असून, त्यांची सदस्यसंख्या सुमारे २ लाख २७ हजार २४१ इतकी आहे. याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत मतदानापासून वंचित आहेत. हा त्यांच्यावर अन्याय आहे. या संस्थांचे सर्वंकष प्रतिनिधित्व विधान परिषदेत जात नाही, असे बहुतांशी ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समिती सदस्यांचे म्हणणे आहे.घोडेबाजाराला बसेल आळातालुका पंचायत आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील मतदारांची संख्या कमी राहते. त्यामुळे उमेदवारांना मतदारांचा घोडेबाजार करण्यास वाव मिळतो. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत याचा अनुभव सर्वांनाच आला होता. मतदारांची संख्या वाढल्यास या घोडेबाजाराला आळा बसू शकेल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कर्नाटकात आहे मताधिकारकनार्टक विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत सदस्यांनाही आपल्या मागण्या विधान परिषदेत मांडता येतात. आपला हक्काचा प्रतिनिधी तेथे असल्याचे समाधानही त्यांना मिळते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही या मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मताधिकार मिळावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य करू लागले आहेत.राज्यपाल, राज्य निवडणूक आयोग सकारात्मकग्रामपंचायत हा घटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामपंचायत सदस्यांना तसेच तालुका पंचायत सदस्यांना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत मताधिकार मिळाला पहिजे, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडीचे माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री, विरोधी पक्षनेत्यांना दिले आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी या मुद्द्यावर सकारात्मक आहेत. या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती अमितकुमार भोसले यांनी दिली.‘लोकमत’चा पाठपुरावाविधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुका आणि पंचायत समितीच्या सदस्यांना मताधिकार मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे विधानसभेतील सदस्यसंख्येच्या एक तृतियांश सदस्यसंख्या विधान परिषदेची असली पाहिजे, अशी घटनात्मक तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ९६ असायला हवी. ती सध्या ७८ आहे. या तरतुदीनुसार सदस्यसंख्या वाढविण्यासाठी विधान परिषदेतील मतदारसंघांची पुनर्रचना करायला हवी, हा मुद्दा ‘लोकमत’ने सर्वप्रथम लेखाद्वारे उपस्थित केला होता. त्याचाच आधार घेऊन तालुका पंचायत आणि ग्रामपंचायत सदस्य मताधिकाराची मागणी करू लागले आहेत. अमितकुमार भोसले यांनीही याच्याच आधारे निवेदन दिले आहे.