शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

'व्होटर स्लिप' पोहोचल्याच नाहीत

By admin | Updated: February 22, 2017 13:58 IST

गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे काम महापालिका प्रशासनाचे सोमवार पर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही.

'व्होटर स्लिप' पोहोचल्याच नाहीतअमरावती : गाजावाजा करून हाती घेतलेले मतदार स्लिप वाटण्याचे काम महापालिका प्रशासनाचे सोमवार पर्यंतही पूर्ण होऊ शकले नाही. अखेर शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना राजकीय पक्षांनी वाटलेल्या स्लिपवरच अवलंबून राहणे लागण्याची वेळ आली आहे. आज मंगळवारी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. अनेक भागांमधील मतदान केंद्रांचा घोळ अजूनही कायम आहे. मतदान केंद्रे न सापडणे आणि एकाच घरातील सदस्यांना वेगवेगळी मतदान केंद्रे मिळणे हा अनुभव यंदाही आला. निवडणुकीपूर्वी मतदारांना मतदान केंद्राचा तपशील पुरविणाऱ्या मतदार स्लिप पूर्वी राजकीय पक्षांच्या यंत्रणांमार्फत घरोघरी वाटण्यात येत असत. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये प्रशासनाने हे काम आपल्या हाती घेतले. मात्र, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे तसेच कर्मचाऱ्यांना पत्ते शोधण्यात येणाऱ्या अडचणीांुळे हे काम पूर्ण होत नाही, असे यापूर्वी आढळून आले आहे. हाच अनुभव यंदाही मतदारांना येत आहे. हजारो कुटुंबांमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या स्लिप पोहोचलेल्या नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये घरोघरी आपल्या नावाने स्लिप वाटल्या, त्यांचा मतदारांना उपयोग होणार आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन स्लिप देणार असल्याने उमेदवारही त्या भरवशावर राहिले. त्यामुळे अनेक मतदार केंद्रांबाबत अनभिज्ञ राहिले. शहरातील सव्वा ते दीड लाख कुटुंबांकडे मतदार स्लिप वाटण्याचे काम ४ दिवसांपूर्वी करण्यात आले. त्यासाठी लिंक वर्करसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. मात्र प्रभागाचा पसारा पाहता व्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहचू शकल्या नाहीत. (प्रतिनिधी)केंद्राचा घोळ कायम४मतदार यादीत नावे नोंदविणे आणि त्यांना क्रमांक देण्याचा जुनाच पायंडा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील काही सदस्यांचे मतदान एका केंद्रात आणि काही जणांचे दुसऱ्या केंद्रात अशी स्थिती अनुभवास मिळाली. तसेच यंदा प्रभागाचा आकार वाढल्याने मतदान केंद्र दूर असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका प्रशासनाला दर पंचवार्षिकप्रमाणे यंदाही वेळेत मतदार स्लिप वाटण्यात अपयश आले. तसेच मतदार यादीमधील घोळामुळे मतदारांच्या उत्साहावर पाणी फेरले. शहरात अनेक ठिकाणी प्रभागाच्या सीमेवर राहणऱ्या शेकडो नागरिकांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून गायब झाल्याचे दिसून आलेत.