शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

त्रिपुरातल्या ढलाईला वैदर्भिय जिद्दीची भेट

By admin | Updated: February 6, 2016 19:06 IST

देशाच्या अतीपूर्वेला भारत-बांग्लादेश सीमेवर असलेल्या त्रिपुरातल्या अतीदुर्गम ढलाई जिल्ह्यानं मनरेगाच्या कामात एक नवा विक्रम करुन दाखवला आहे

मुळच्या विदर्भातल्या असलेल्या जिल्हाधिका-यांचा राष्ट्रीय विक्रम
मेघना ढोके
नाशिक-दि. 6 - देशाच्या अतीपूर्वेला भारत-बांग्लादेश सीमेवर असलेल्या त्रिपुरातल्या अतीदुर्गम ढलाई जिल्ह्यानं मनरेगाच्या कामात एक नवा विक्रम करुन दाखवला आहे आणि या विक्रमाचे मानकरी आहेत त्रिपुराचे जिल्हाधिकारी डॉ.संदीप राठोड. ते मुळचे विदर्भातल्या पुसद जिल्ह्यातले, मात्र प्रशासकीय सेवेत त्यांनी आपल्या कर्तबगारीनं त्रिपुरा आणि ढलाई जिल्ह्याला देशात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
त्रिपुरातल्या केवळ शेतीवर जगणा-या समाजव्यवस्थेत मनरेगानं स्थानिकांना जगण्याचं एक साधन मिळवून दिलं आहे. अत्यंत दुर्गम भाग, दळणवळणाची साधनं कमी आणि रोजगाराची साधनं दुर्मिळ. त्यामुळे अतीगरीब आणि मागास लोकांपर्यंत मनरेगा पोहचवून त्याची उत्तम अमलबजावणी हेदेखील एक आव्हान होतं. मात्र ते आव्हान पेलत देशभरातील 688 जिल्ह्यातून मनरेगाच्या सर्वोत्कृष्ट कामाचा पुरस्कार ढलाई जिल्ह्यानं मिळवला. देशभरात सर्वाधिक मनुष्यदिवस काम देण्याची नोंद या जिल्ह्याच्या नावावर करण्यात आली आहे. 2014-15 या आर्थिक वर्षात प्रत्येक घरटी 98.79 टक्के दरानं 74.65 लाख मनुष्यदिवस काम ढलाई जिल्ह्यात देण्यात आलं. मनरेगाच्या नियमाप्रमाणं मागितलं तर 100 दिवस कामाची हमी आहे, त्यानुसार शेकडा 98 टक्के म्हणज 98 दिवसाहून अधिक काम या जिल्ह्यात मनरेगाच्या योजनांतर्गत करण्यात आलं. 
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते डॉ. राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारत-बांग्लादेश सीमेजवळ असलेला हा दुर्गम जिल्हा. बांधाला बांध असावा तशी बॉर्डरला बॉर्डर चिकटून आहे. या जिल्ह्यातच असलेलं चंदननगर हा वादग्रस्त भूभाग आता नव्या भारत-बांग्लादेश करारानुसार भारतात दाखल झाला. अशा अतीमहत्वाच्या या जिल्हयात महाराष्ट्रातून 2009 साली थेट रिक्रूट झालेले डॉ. राठोड कार्यरत आहेत. बंगाली भाषेत उत्तम संवाद साधत ते स्थानिकांशी थेट संवाद साधतात. छोटय़ामोठय़ा गावासह सीमा सुरक्षा बलाच्या सीमेवर कार्यरत तुकडय़ांशी त्यांचा चांगला संपर्क असतो. देशाच्या एका टोकाला असलेल्या या जिल्हयातही उत्तम काम होऊ शकतं, आणि तुटलेपणाची भावना असलेली ही गावं, इथली माणसं मुख्य प्रवाहातल्या विकास योजनांचे लाभ मिळवू शकतात हे डॉ. राठोड यांनी दाखवून दिलं आहे.