शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

भाविकांच्या गर्दीअभावी दर्शन उत्तम; पण दहशतीचे सावट कायम!

By admin | Updated: July 20, 2016 04:16 IST

जम्मू ते श्रीनगर बससेवा ठप्प केल्याने अमरनाथ यात्रेत अनेक भाविकांना इच्छा असतानाही सहभागी होता आले नाही.

पंकज पाटील,

अंबरनाथ- काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण असल्याने आणि जम्मू ते श्रीनगर बससेवा ठप्प केल्याने अमरनाथ यात्रेत अनेक भाविकांना इच्छा असतानाही सहभागी होता आले नाही. त्यामुळे बालटाल ते अमरनाथ गुंफा पर्यंतच्या मार्गावर भाविकांची तुरळक गर्दी दिसत होती. एवढेच नव्हे तर मूळ गुंफेपर्यंत गेल्यावर बाबांचे दर्शन घेण्यासाठी जे दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागते तेथे यंदा अवघे १५ ते २० मिनीटे लागत होते. तणावपूर्ण वातावरणातून वाट काढत जो भाविक गुंफेपर्यंत पोहचला त्या भाविकाला कधी नव्हे एवढे चांगले दर्शन घेण्याचा आनंद मिळाला. मात्र त्यानंतर तब्बल तीन-चार दिवस भाविकांना बालटालमध्येच अडकून पडावे लागले.श्रीनगर ते बालटाल आणि श्रीनगर ते पेहलगामपर्यंत भाविकांना पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जीव मुठीत घेऊन अनेक भाविक हे बालटाल आणि पेहलगामपर्यंत आले. मात्र पुढे दर्शनासाठीचा खडतड प्रवास कसा करावा हा भाविकांपुढे मोठा प्रश्न होता. जे भाविक बालटालपर्यंत पोहचले त्या भाविकांपैकी शेकडो भाविकांना दोन दिवस बालटालमध्ये अडकून पडावे लागले. दोन दिवस यात्रा बंद असल्याने हजारो भाविकांची यात्रा सुरु झाल्यावर गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यात्रेच्या ठिकाणापर्यंत पोहचणेच शक्य न झाल्याने अडकलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला. त्यानुसार यात्रा सुरु झाल्यावर लागलीच सकाळी ६ वाजता भाविकांचा कारवाँ अमरनाथ बाबांच्या गुंफेच्या दिशेने निघाला. बालटाल ते बाबांची गुफा हे १२ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी सर्वसाधारण ६ तास लागतात. मात्र यात्रेत भाविकांची संख्या कमी असल्याने आणि रस्ते मोकळे असल्याने हे अंतर भाविकांनी सहज ४ तासांतच कापले. बालटाल ते गुंफेपर्यंतचा रस्ता हा अत्यंत अवघड आणि वळणाचा आहे. दोन ते तीन हजार फूट खोल दरीच्या कडेकडेने चालताना भाविक ‘जयभोले’चा जयघोष करीत हा धोकादायक वळणावळणाचा रस्ता सहज पार करीत होते. ज्या भाविकांना हा धोकादायक प्रवास करणे शक्य होत नाही अशा भाविकांना बालटाल पासून हेलिकॉप्टरने पंचतरणीपर्यंत पोहचण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र पंचतणीपासून पुन्हा गुंफेपर्यंत जाण्यासाठी सहा कि.मी.चे अंतर हे अवघड वळणातूनच कापावे लागतेच. थंड वातावरणामुळे येथील दगडी पायऱ्या देखील बर्फाच्या लादीप्रमाणे थंड झालेल्या असतात. त्यामुळे बर्फाच्या लादीवरुन चालत असल्याचा अनुभव भाविकांना येतो. अनेक यात्रेकरुन पोहचू न शकल्याने बाबांच्या गुंफेत भाविकांना थांबून दर्शन घेता येत होते. गर्दी नसल्याने येथील सुरक्षा रक्षक देखील भाविकांना रेंगाळले तरी अडवत नव्हते. ज्या ठिकाणी भाविकांना अर्धा मिनीट देखील थांबविले जात नाही त्या ठिकाणी भाविक ३ ते ५ मिनीट थांबून बाबांचे दर्शन घेत होते. चांगले दर्शन मिळाल्याने तेथे पोहोचलेले मोजकेच भाविक आनंदात परतीचा प्रवासासाठी खाली उतरले. जे भाविक घोड्यावरुन आले त्यांनी घोड्यावरुन पुन्हा खाली येण्याचा मार्ग पकडला. मात्र ज्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केला होता त्यांच्या वाट्याला निराशाच आली. हेलिकॉप्टर सेवा इंधनाअभावी बंद झाल्याने भाविकांना आता घोड्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. जीव मुठीत धरून अनेक भाविकांनी हा अवघड मार्गावरुन उतरण्याचा निर्णय घेतला. >काश्मिरातील बिघडलेल्या परिस्थितीचे सावट यंदाच्या अमरनाथ यात्रेवर पडले. यात्रा काही काळ स्थगितही झाली. अडकलेले पर्यटक, यात्रेकरूंचे हाल झाले. या यात्रेत सहभागी झालेल्या ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने या प्रवासातील नोंदवलेली निरीक्षणे.दर्शन झाल्याचे समाधान असले तरी आपल्या नियोजित स्थळी पोहचण्यासाठी पुन्हा कसरत करावी लागली. बालटालमधून बाहेर पडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गाड्या बाहेर सोडत नसल्याचे कळताच आता आपण अडकलो, अशी बहुतांश भाविकांमध्ये भावना निर्माण झाली. दोन ते तीन दिवसांपासून शेकडो यात्रेकरु या बालटालमध्ये अडकून पडले होते. त्यांच्या गाड्या श्रीनगरपर्यंत सोडण्यात येत नव्हत्या. रात्री १० वाजता गाड्या सोडणार, अशी अपेक्षा असताना सरकारने बालटालहून गाड्या न सोडता श्रीनगरहून भाविकांना बालटालर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरुन दोन्ही बाजुला वाहतूक सुरु झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि या कोंडीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने सरकारने एका बाजूनेच वाहतूक सुरु केली. अखेर चार दिवसांनंतर परतीचा प्रवास सुरू झाला.