शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

परभणीत आक्रोश मोर्चाद्वारे अ‍ॅट्रॉसिटीला विराट समर्थन

By admin | Updated: October 17, 2016 19:40 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे लाखोंच्या जनसमुदायाने एकतेचा संदेश दिला़

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. १७ : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे लाखोंच्या जनसमुदायाने एकतेचा संदेश दिला़. दलित, बौद्ध, मुस्लीम, आदिवासी, ओबीसी अशा सर्वच घटकातील समाजबांधवांनी या मोर्चाद्वारे एकत्र येऊन अ‍ॅट्रॉसिटीचे जोरदार समर्थन केले़.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणीत आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते़. सकाळी १० वाजेपासूनच शहरातील विविध मार्गांवरून निळे झेंडे हातात घेऊन समाजबांधव परभणीत दाखल होत होतो़. कोणी गाड्या करून तर कोणी रेल्वे, बस अशा जमेल त्या साधनाने परभणीमध्ये जत्थेच्या जत्थे दाखल होण्यास सुरुवात झाली़. शहरातील शनिवार बाजार भागातून हा मोर्चा निघणार असल्याने या ठिकाणी समाजबांधव एकत्र झाले़. मोर्चाच्या अनुषंगाने शहरातील सर्व रस्ते वाहुकीसाठी बंद करण्यात आले होते़. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला़.

शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़. अग्रभागी विद्यार्थिनी त्यानंतर महिला त्यांच्या पाठीमागे युवक आणि सर्वात शेवटी स्वयंसेवक असे मोर्चाचे नियोजन केले होते़. साधारणत: दीड वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महिला दाखल होण्यास प्रारंभ झाला़. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते़. महिला मोर्चा स्थळी पोहचल्या त्यावेळी युवकांची रांग शिवाजी चौकापर्यंत होती़. यावरून मोर्चातील गर्दी लक्षात येते़.

अ‍ॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ विविध घोषणा देत हातात फलक घेऊन मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते़. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोर्चेकरी दाखल झाले़. या ठिकाणी पाच विद्यार्थिनींची व अन्य काही मान्यवरांची भाषणे झाली़. त्यानंतर निवेदनाचे वाचन करण्यात आले़. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला़ तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़. विद्यार्थिनींची मनोगते सुरू असतानाच जय भीमचे नारे आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदूमून गेला़.

लाखोंच्या संख्येने जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता़. तरीही कुठेही शिस्तीचे उल्लंघन झाले नाही़. शांततेत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या़. विशेष म्हणजे दुपारचे कडक ऊन असतानाही समाजबांधव एक ते दीड तास आंदोलनस्थळी बसून होते़. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना विविध २२ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़. त्यात सुधारित अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कडक अंमलबजावणी करावी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गैरवापर होत आहे, अशा वल्गना काही जण जाणीवपूर्वक करीत असून, दलित, मागासर्गीयांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत, याविरूद्ध सरकारने त्वरित पावले उचलून दलितांना संरक्षणाची हमी द्यावी, राज्यात प्रलंबित असलेले अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे़. दुपारी १़१५ मिनिटांनी या मोर्चाला प्रारंभ झाला आणि साधारणत: २़५९ मिनिटांनी मोर्चाचा समारोप झाला़. समारोपानंतरही शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला आणि त्यानंतर युवक मोर्चा स्थळाहून बाहेर पडले़. यावेळी मोर्चातील स्वयंसेवकांनी शहरात कुठेही कचरा होणार नाही, याची काळजी घेतली़ ठिक ठिकाणी स्वयंसेवक कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले़.

महिला, युवतींचा लक्षणीय सहभागजिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चात महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग होता़. तसेच डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यावसायिक आदी विविध स्तरातील नागरिक या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते़. सोमवारच्या मोर्चाने परभणीत एकजुटीचा इतिहास घडविला़. मोर्चानंतर स्वंयसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले.

हा प्रतिमोर्चा नाहीपरभणीत काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही़. दलित, मागासवर्गीय, मुस्लीम आदी बहुजन समाजबांधवांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे़. त्यामुळे हा प्रतिमोर्चा नाही, असे मोर्चातील संयोजकांनी यावेळी बोलताना सांगितले़. जवळपास ४ ते ५ लाखांचा जनसमुदाय मोर्चाला उपस्थित होता, असा संयोजकांनी दावा केला.