शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणासाठी ‘कन्या सुरक्षा कवच’

By admin | Updated: February 6, 2017 01:51 IST

बदलत्या वातावरणामुळे निसर्गनियमानुसार मुुलींना शालेय वयातच मासिक पाळी चालू होते, यातून उदासीनता येऊन शिक्षणात त्याचा परिणाम होतो.

आशपाक पठाण , लातूरबदलत्या वातावरणामुळे निसर्गनियमानुसार मुुलींना शालेय वयातच मासिक पाळी चालू होते, यातून उदासीनता येऊन शिक्षणात त्याचा परिणाम होतो. हीच समस्या दूर करण्यासाठी लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात ‘कन्या सुरक्षा कवच’ हा उपक्रम हाती घेतला आहे.यात मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी माता-पित्यांबरोबरच शिक्षकांचीही असावी, म्हणून लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी तांदुळजा जिल्हा परिषद शाळेत एटीएमप्रमाणे मशीन बसवून मुलींना पाच रुपयांत नॅपकिन उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, तालुक्यात एकूण ८१ जिल्हा परिषद शाळांतील किशोरवयीन मुलींसाठी तेथील शिक्षिकांकडेच नॅपकिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, सक्षमीकरण करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, यासाठीच लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुली लाजल्या़ आम्ही त्यांची समजूत घातली़ त्यामुळे या उपक्रमाला मुलींचा प्रतिसाद वाढत असल्याचे तांदुळजा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा सुपेकर म्हणाल्या़ शिक्षणाबरोबर आरोग्याची काळजी - तृप्ती अंधारे हर एक माय माझी, वाघीण झाली पाहिजे, इथे-तिथे राबण्याऐवजी ती शाळेत आली पाहिजे, हे ब्रीद घेऊन गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या मुलींचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा याविषयी काळजी घेत आहेत. तांदुळजा जिल्हा परिषद शाळेत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, आता हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या सूचनेनुसार जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.