शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कोकणाला जोडण्यासाठी ‘गाव प्रमुख’ योजना

By admin | Updated: October 19, 2016 02:02 IST

मुंबई महानगरपालिकेत पक्षाला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्याची इच्छा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : भारतीय जनता पार्टीने देशासह राज्यात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत पक्षाला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्याची इच्छा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, कोकणाला मुंबईशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी ‘गाव प्रमुख’ ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असल्याचे लाड यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये बोलताना सांगितले.प्रसाद लाड म्हणाले की, कोकणाच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. सरासरी कोकणाच्या प्रत्येक गावातील एक व्यक्ती मुंबईत रोजगारासाठी कामाला आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील लोकांना त्यांचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे, याची माहिती नसते. त्यामुळे मुंबईत कामाला असलेल्या कोकणातील चाकरमान्याला ‘गाव प्रमुख’ म्हणून नेमण्यात आले आहे. हा ‘गाव प्रमुख’ गावपातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका साकारेल. जेणेकरून ग्रामपातळीवरील समस्या मंत्रालयात अडकून न राहता तत्काळ सोडवल्या जातील. अशा प्रकारे आत्तापर्यंत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ३ हजार ८०७ गावांसाठी सुमारे २ हजार गाव प्रमुखांची नेमणूक केलेली आहे. यामुळे गावकऱ्यांना थेट सरकारसोबत संपर्क साधता येणार आहे.कोकणासह राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम भाजपाने हाती घेतले आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील ५ हजार सुशिक्षितांना नोकरी न देता येत्या सहा महिन्यांत स्वयंरोजगार देणार असल्याचे लाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, या अभिनव संकल्पामध्ये तरुणांना भांडवल उपलब्ध करून देत व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून प्रत्येक युवक उद्योगपती होईल. यामुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)>‘ब्रेड बास्केट’ सुरू करणार!युरोपात ‘ब्रेड बास्केट’ संकल्पनेतून पर्यटकांना आकर्षित केले जाते. या संकल्पनेत पर्यटकांना समुद्रकिनारी राहण्यासोबत सकाळच्या न्याहरीची व्यवस्था केली जाते. राज्यात सर्वाधिक आणि सलग पट्ट्यातील समुद्रकिनारा कोकणाला लाभला आहे. त्यामुळे कोकण पर्यटनाद्वारे ‘ब्रेड बास्केट’ संकल्पनेतून २ हजार गावांचा विकास केला जाईल.>पर्यटनाच्या समृद्धीकडेकोकणातील पर्यटन व्यवसायात वृद्धी व्हावी, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालत असल्याचे लाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, कराड-चिपळूण रेल्वेमार्ग, मुंबई-गोवा बायपास अशा अनेक प्रकल्पांची घोषणा झाली असून ते तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करून फळबागांसाठी प्रोसेसिंग युनिट्स उभारले जातील. जेणेकरून येथील तरुणांवर स्थलांतर करण्याची वेळ उद्भवणार नाही.>कामाची पावती मिळणार!याआधी म्हाडाचे सभापती म्हणून मी केलेल्या कामाचा फायदा पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, म्हाडाबाबत लोकांच्या मनात जी भावना आहे, ती बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी शासनाने विविध योजनांवर काम केले आहे. लवकरच स्वस्त घरांबाबत शासन घोषणा करेल. शिवाय याआधी मी स्वत: सभापती असताना अनेक संस्थांना मदत केलेली आहे. त्याची पावती म्हणून लोक पक्षाला येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर घेऊन जातील, यात शंकाच नाही.