शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

ऐनशेतमध्ये एक गाव एक बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:52 IST

वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय.

वाडा : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक गणेशोत्सवापैकी वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय. यावर्षी मंडळाने बेटी बचाओ; बेटी पढाओ चा संदेश दिला आहे. ‘आज मुलीचा जीव घेऊन उद्या सून आणाल कोठून’ असा प्रश्न या मंडळाने संदेशाद्वारे नागरिकांना विचारला आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या उत्सवाची सुरवात ऐनशेत गावात सन १९५३ साली झाली. ६४ वर्षापूर्वी कोणत्याही सोयी सुविधा नसताना नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना या गावातील काही होतकरू तरूणांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. प्रत्येकी १ रूपया २५ पैसे वर्गणी काढून हा गणेशोत्सव सुरू झाला. आज या गणेशोत्सवाने ६४ वर्षे पूर्ण केली. यासाठी गावकरी त्या पूर्वजांचे फक्त ऋणच व्यक्त करतात असे नाही तर या ६४ वर्षाच्या कालावधीपेक्षा त्यांनी स्थापन केलेल्या या उत्सवाने गावाला जे दिले. जी संस्कृती दिली त्याचे महत्व ग्रामस्थ व कार्यकर्ते अभिमानाने सांगतात. ६४ वर्षे अखंडपणे आणि एकोप्याने हा उत्सव साजरा होतो . गावातील ४ थी पिढी हा उत्सव साजरा करतेय. या चार पिढ्यांमध्ये या उत्सवाची कमान चढतीच राहिली आहे. सव्वा रूपये वर्गणीने सुरू झालेल्या गणेशोत्सवात आज रोजी सव्वा लाख रु पये वर्गणी स्वखुशीने व सढळहस्ते मंडळाच्या मंडपात ही वर्गणी आणून दिली जाते हे या उत्सवाचे यश आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने गावातील तरूणांना एकत्र यायला शिकविले एकत्र बसायला शिकविले बैठकीतून गावाच्या प्रगतीचे विकासाचे नियोजन करायला शिकवले ही संस्कृती या गावातील पूर्वजांनी या गावाला लावून दिली आहे. तेव्हाचा तरूण असाच एकत्र येऊन निर्णय घेत होता. आजही घेतोय. कारण संपूर्ण गावातील सर्व नागरिक एकत्र येण्याचा योग म्हणजे गणेशोत्सव आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने जसे तरूणांना एकत्र आणले लहान विद्यार्थ्यांनाही गोडी लावली. ज्येष्ठांना मार्गदर्शनाची संधी दिली. (वार्ताहर) >गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कारया उत्सवातून रक्तदान शिबिर, विविध नामवंताचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कार, गावातील ज्येष्ठांचा सत्कार, गरजवंताना मदत, गावातील आपदग्रस्तांना मदत, विद्यार्थाना बक्षिसे असे अनेक उपक्र म गेली ६४ वर्षे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहेत. यावर्षी बेटी पढाओ बेटी बचाओ चा संदेश देण्यात आला आहे. या मंडळाने अनेक पुरस्कार ही मिळवाले आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरेश्वर ठा।करे यांनी दिली आहे. >महिलांचा सक्रीय सहभागगणेशोत्सवातील महिलांचा सहभाग हे या गणेशोत्सवाचे वैशिष्टय आहे. समुह नृत्य असो, भजन असो, स्पर्धा असोत, सांस्कृतिक कार्यक्र म असोत किंवा एखादी जबाबदारी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा एक परिपाठ निर्माण झाला आहे. सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा गावात राहणारे कुणबी, वारली, कोळी, कातकरी समाजापैकी कोणतेही समाज या उत्सवापासून दूर राहात नाही. उत्सवाची आखणी करण्यापासून सर्वाचाच सहभाग असता अशी माहिती उत्सवाचे अध्यक्ष मोरेश्वर ठाकरे यांनी दिली.