शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पीक विमा न दिल्याप्रकरणी चौकशी समिती

By admin | Updated: March 30, 2017 03:34 IST

नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळाली नसल्याच्या मुद्यावरुन आज भाजपा

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळाली नसल्याच्या मुद्यावरुन आज भाजपा आणि शिवसेनेचे सदस्य विधानसभेत अतिशय आक्रमक झाले. शेवटी या प्रकरणी चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.नांदेड जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत २ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केळी पिकाच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून ३.२५ कोटी रुपये जमा करण्यात आले, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले. मात्र, अनेक शेतकरी या लाभापासून वंचित असल्याचा मुद्दा सुभाष साबणे, जयप्रकाश मुंदडा, योगेश सागर, हेमंत पाटील यांनी लावून धरला. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ हजार ३०७ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र नसल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांना मुद्दाम वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, चौकशीची घोषणा फुंडकर यांनी केली. तसेच २०१७-१८ च्या खरीप हंगामापासून पीक विम्यामध्ये पीक निहाय समावेश करण्यात येईल, आणि नुकसान भरपाईचे पंचनामे करताना महसूल, कृषी आणि विमा कंपनीचे अधिकारी एकत्र प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही फुंडकर यांनी सांगितले. चंद्रकात पाटील यांचा प्रत्येक प्रश्नावर होकारसदस्यांनी मागणी केली आणि त्यावर लगेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागणी मान्य केली असे आज विधानसभेत तीनवेळा घडले. पाटील यांच्या तत्पर आश्वासनाचे सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.सातारा येथील करंजी नाकार ते महालक्ष्मी गोडवली रस्त्याचे नगरपालिका हद्दीतील काम भूसंपादन करून तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भाजपाचे सुरेश खाडे यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करून लगेच आश्वासन पदरात पाडून घेतले. संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील आरवली-माखजन रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, चिपळूण तालुक्यातील तांबी नदीवरील पुलाचे नव्याने बांधकाम केले जाईल, असे आश्वासन पाटील यांनी सदानंद चव्हाण यांच्या प्रश्नात दिले. अतिवृष्टीतील मदतीत वाढ करण्याचा प्रस्तावअतिवृष्टीत नुकसान झालेल्या घराची भरपाई ही केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याचा किंवा या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.रायगड जिल्ह्यातील चांगेवाडी या आदीवासी वाढीतील पुरग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य मनोहर भोईर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कांबळे बोलत होते.