शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लोकसहभागातून रुजतेय जलसंधारणाची चळवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 20:33 IST

 संदीप वानखडे /ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 8 - गेल्या काही वर्षात विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. तसेच ...

 संदीप वानखडे /ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 8 - गेल्या काही वर्षात विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. तसेच पिकांनाही पाणी मिळाले नाही. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीटंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यात वॉटर कप राबवण्यात येत आहे. कपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ रुजत आहे. 
प्रत्येक गावात पाणलोट व्वस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ््या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. पाणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना अमरावती जिल्ह्यतील पोरगव्हाण येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपआपल्या गावांमध्ये मोहिमेचे काम सुरू सुद्धा केले आहे. प्रशिक्षित व्यक्ती पावसाचे पाणी साठवण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यासाठी काय करण्याची गरज आहे, हे पटवून देत आहेत. या मोहिमेच्या दुसऱ्या सत्राचा कालावधी ८ एप्रिल २०१७ ते २३ मे २०१७ असा आहे.
१८० गावांनी घेतला सहभाग 
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील १८० गावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील ७०, पातूर तालुक्यातील ६१ आणि अकोट तालुक्यातील ४९ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत बार्शीटाकळी तालुक्यातील २२ गावे, पातूर तालुक्यातील १६ गावे आणि अकोट तालुक्यातील ३४ गावे प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. 
२४९ लोकांनी घेतले प्रशिक्षण 
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था पाणी फाउंडेशनच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पोरगव्हाण येथे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणादरम्यान, ग्रामस्थांना श्रमदानाचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे संचयन कसे करावे, शिवार फेरी आदींसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहेत. या प्रशिक्षणात आतापर्यंत २४९ लोकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातून १०४, पातूर तालुक्यातून ७२ आणि अकोट तालुक्यातून ७३ लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे.एक कोटीचे बक्षिसे 
सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना पाणी फाउंडेशनच्यावतीने रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाखांचा पुरस्कार मिळणार आहे. तसेच तालुका स्तरावरही पुरस्कार मिळणार आहेत. तालुक्यात जलसंधारणाची उत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. 
असे मिळतील गावांना गुण 
सत्यमेंव जयते वॉटर कप ही स्पर्धा ४५ दिवस चालणार असून, १०० गुणांची राहणार आहे. यामध्ये नांदेड पॅटर्न शोष खड्डे ५ गुण, वृक्षरोपण खड्डे ५ गुण, श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना ५ गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज माथा उपचारांवर योग्य भर १० गुण, रचनांची गुणवत्ता १० गुण, मूलस्थानी मृदा उपचार १० गुण, पाणी बचत तंत्रज्ञान ५ गुण, वॉटर बजेट ५ गुण, विहीर आणि बोअरवेल पुनर्भरण ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचानांची दुरुस्ती, नावीण्यपूर्ण उपक्रम ५ गुणांचा समावेश आहे. 
प्रशिक्षित लोकांनी सुरू केली कामे 
प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपापल्या गावात कामे सुरू केली आहेत. घर तेथे शोष खड्डे, गावात प्रभात फेरी, शिवार फेरी, चावडीवर दुष्काळाशी दोन हातवर चित्रपट दाखवणे, ग्रामस्थ या कामांसाठी स्वत: लोकवर्गणी करीत आहेत. गाव बैठका, विद्यार्थ्यांसाठी पाणी या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन, पाणी विषयाची मशाल फेरी काढण्यात येणार आहे. स्पर्धेत गावांना बार्शीटाकळी तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, समाधान वानखडे, पातूरचे प्रफुल कोल्हे, सुभाष नानवटे, अकोट तालुक्यासाठी नरेंद्र काकड आणि मनीष महल्ले आदी मार्गदर्शन करीत आहेत. 
https://www.dailymotion.com/video/x844vdr