शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

VIDEO- धक्कादायक! स्मशानभूमीच्या जागेसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको

By admin | Updated: September 8, 2016 17:16 IST

स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला

ऑनलाइन लोकमतसंग्रामपूर, (जि.बुलडाणा), दि. 8 -  तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध समाज बांधवांना स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला. त्यानंतरही मागणीची दखल घेण्यात न आल्याने ५ किलोमीटर मोर्चा काढून महिलांनी खांदा देत मृतदेह तहसील कार्यालयावर आणले. हा प्रकार ८ सप्टेंबर रोजी घडला.

तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात सुरु होता. दरम्यान याप्रकरणी गत दोन महिन्यापूर्वी निकाल विरुध्द बाजूने लागला. दरम्यान ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील लिलाबाई बळीराम इंगळे (वय ७०) यांचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेवर अंत्यसंस्कार कोठे करावा असा प्रश्न उपस्थित झाल्यावर गावातील पोलीस पाटील यांनी तहसिलदार व ठाणेदार यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार चव्हाण व ठाणेदार बळीराम गीते यांनी तात्काळ वरवट बकाल येथे हजर होवून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा रात्री ९ वा. पासून ते सकाळी ४ वाजेपर्यंत सुरु होती. या चर्चेअंती मृतक महिलेचा दफनविधी हा वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील लेंडी नदीजवळील काठावर करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी मृतकाचे नातेवाईक मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लेंडी नदीजवळील काठावर गेले तेव्हा याठिकाणी काही बौध्द समाज बांधवांनी आम्हाला हक्काची व अधिकाराची स्मशानभुमी द्या, अशी मागणी ठाणेदार बळीराम गिते यांच्याकडे केली.

तर यावेळी तहसीलदार चव्हाण हे बुलडाणा येथे मीटींगसाठी गेले असल्याने ठाणेदार गिते यांनी तहसिलदार चव्हाण यांच्यासोबत याबाबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. मात्र यावेळी स्मशानभूमीसाठी कायमस्वरुपी जागेच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या बौध्द समाज बांधवांनी मृत वृध्द महिलेचे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावर ठेवले. या प्रकारामुळे सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामगाव पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रेत रस्त्यावर ठेवूनही स्मशानभुमीकरीता जागा मिळत नसल्यामुळे अखेर आंदोलक महिलांनी प्रेताला खांदा देवून हे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत ५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयावर एकच खळबळ माजली होती.