शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- धक्कादायक! स्मशानभूमीच्या जागेसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको

By admin | Updated: September 8, 2016 17:16 IST

स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला

ऑनलाइन लोकमतसंग्रामपूर, (जि.बुलडाणा), दि. 8 -  तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध समाज बांधवांना स्मशानभूमीकरिता जागा नसल्यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह वरवट बकाल-संग्रामपूर रस्त्यावर ठेवून तीन तास रास्ता रोको केला. त्यानंतरही मागणीची दखल घेण्यात न आल्याने ५ किलोमीटर मोर्चा काढून महिलांनी खांदा देत मृतदेह तहसील कार्यालयावर आणले. हा प्रकार ८ सप्टेंबर रोजी घडला.

तालुक्यातील वरवट बकाल येथील बौद्ध स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात सुरु होता. दरम्यान याप्रकरणी गत दोन महिन्यापूर्वी निकाल विरुध्द बाजूने लागला. दरम्यान ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील लिलाबाई बळीराम इंगळे (वय ७०) यांचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेवर अंत्यसंस्कार कोठे करावा असा प्रश्न उपस्थित झाल्यावर गावातील पोलीस पाटील यांनी तहसिलदार व ठाणेदार यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार चव्हाण व ठाणेदार बळीराम गीते यांनी तात्काळ वरवट बकाल येथे हजर होवून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा रात्री ९ वा. पासून ते सकाळी ४ वाजेपर्यंत सुरु होती. या चर्चेअंती मृतक महिलेचा दफनविधी हा वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील लेंडी नदीजवळील काठावर करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी मृतकाचे नातेवाईक मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लेंडी नदीजवळील काठावर गेले तेव्हा याठिकाणी काही बौध्द समाज बांधवांनी आम्हाला हक्काची व अधिकाराची स्मशानभुमी द्या, अशी मागणी ठाणेदार बळीराम गिते यांच्याकडे केली.

तर यावेळी तहसीलदार चव्हाण हे बुलडाणा येथे मीटींगसाठी गेले असल्याने ठाणेदार गिते यांनी तहसिलदार चव्हाण यांच्यासोबत याबाबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. मात्र यावेळी स्मशानभूमीसाठी कायमस्वरुपी जागेच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या बौध्द समाज बांधवांनी मृत वृध्द महिलेचे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावर ठेवले. या प्रकारामुळे सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामगाव पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ११ वा. पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रेत रस्त्यावर ठेवूनही स्मशानभुमीकरीता जागा मिळत नसल्यामुळे अखेर आंदोलक महिलांनी प्रेताला खांदा देवून हे प्रेत वरवट बकाल ते संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत ५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयावर एकच खळबळ माजली होती.