शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: September 20, 2016 15:54 IST

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
किन्हीराजा, दि. २० -   मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत. त्यामुळे गावातील आदिवासी वस्ती, बंजारा वस्तीसह वार्ड क्र.३ व ४ मधील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून, मागील दोन  महिन्यांपासून अर्धेअधिक गाव दररोज अंधारातच राहत असल्याने २० सप्टेंबर रोजी ्रग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांसह गावकºयांनी औरंगाबाद-नागपूर हायवेवर  रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला. अखेर महावितरण कंपनीला नमून लेखी आश्वासन देण्याची वेळ आली. लवकरचं वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
 किन्हीराजा गावाचा ७५ टक्के वीजपुरवठा हा बंदच राहत असल्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणात द्धास होत असून वीजपुरवठा नियमित चालू ठेवून नवीन रोहित्र द्यावे व भारनियमन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी २० सप्टेंबर रोजी औरंगाबाद-नागपूर हायवेवर महावितरणच्या ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यााचा इशारा सरपंच  वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी दिला होता.
गेल्या ४ महिन्यांपासून गावात वीजेचा लपंडाव सुरू आहे. गावातील विजयंत्रणा सुरळीत चालू ठेवून शेती सिंचनाला व गावाला नियमितपणे वीजपुरवठा द्यावा यासाठी सरपंच जामकर, उपसरपंच संजय डिवरे यांनी ३१ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या ठरावासह वीज पुरवठा सुरळीत करुन गावात सिंगल फेज योजना वीज पुरवठा सुरळीत करण्यास कुचकामी ठरत आहे. 
त्यामुळे गावातील वीज पुरवठा हा गावठाण फिडरवरुन  करावा व शेती सिंचनासाठी थ्री फेज वीज पुरवठा नियमित द्यावा यासाठी महावितरण कंपनीने प्रयत्न करावे यासाठी ग्रामपंचायतच्या ठरावासह मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार केली होती. सोबतच १७ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले होते; परंतु त्यावेळी दिलेले आश्वासन अधिका-यांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे किन्हीराजा गावात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव वाढला असून दररोज अर्धेअधिक गाव अंधारातच राहत होते. साध्या कारणांमुळेही विज पुरवठा वारंवार बंद राहतो. लोड वाढल्यामुळे गावातील २ रोहित्र जळाले. परंतु दोन महिन्यापासून नवीन रोहित्र मिळाले नाही. गावात कायमस्वरुपी लाईनमन राहत नाही. यासह अनेक अडचणी ग्रामस्थांच वाढल्याने २० सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला.
त्यामुळे २० सप्टेंबर पुर्वी किन्हीराजा गावासाठी स्वतंत्र गावठाण फिडर चालू करावे, कालबाह्य झालेली सिंगलफेज योजना गावातून काढून टाकावी व नवीन थ्री फेजचे रोहित्र गावात द्यावे व भारनियमन किन्हीराजा गावात न होता सर्वच फिडरसोबत किन्हीराजा गाव चालवावे, गावात पडलेले विजेच्या तारेवरचे झोळ काढून नवीन वीज प्रवाहाचे तार टाकावे या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गोदमले, सरपंच वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व उध्दव पाटील गोडे यांच्यासह ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले होते.