शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

VIDEO : वीज वितरणच्या विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: September 20, 2016 15:54 IST

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
किन्हीराजा, दि. २० -   मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील दोन रोहित्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहेत. त्यामुळे गावातील आदिवासी वस्ती, बंजारा वस्तीसह वार्ड क्र.३ व ४ मधील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून, मागील दोन  महिन्यांपासून अर्धेअधिक गाव दररोज अंधारातच राहत असल्याने २० सप्टेंबर रोजी ्रग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांसह गावकºयांनी औरंगाबाद-नागपूर हायवेवर  रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला. अखेर महावितरण कंपनीला नमून लेखी आश्वासन देण्याची वेळ आली. लवकरचं वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
 किन्हीराजा गावाचा ७५ टक्के वीजपुरवठा हा बंदच राहत असल्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणात द्धास होत असून वीजपुरवठा नियमित चालू ठेवून नवीन रोहित्र द्यावे व भारनियमन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी २० सप्टेंबर रोजी औरंगाबाद-नागपूर हायवेवर महावितरणच्या ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यााचा इशारा सरपंच  वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी दिला होता.
गेल्या ४ महिन्यांपासून गावात वीजेचा लपंडाव सुरू आहे. गावातील विजयंत्रणा सुरळीत चालू ठेवून शेती सिंचनाला व गावाला नियमितपणे वीजपुरवठा द्यावा यासाठी सरपंच जामकर, उपसरपंच संजय डिवरे यांनी ३१ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या ठरावासह वीज पुरवठा सुरळीत करुन गावात सिंगल फेज योजना वीज पुरवठा सुरळीत करण्यास कुचकामी ठरत आहे. 
त्यामुळे गावातील वीज पुरवठा हा गावठाण फिडरवरुन  करावा व शेती सिंचनासाठी थ्री फेज वीज पुरवठा नियमित द्यावा यासाठी महावितरण कंपनीने प्रयत्न करावे यासाठी ग्रामपंचायतच्या ठरावासह मागणी कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार केली होती. सोबतच १७ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले होते; परंतु त्यावेळी दिलेले आश्वासन अधिका-यांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे किन्हीराजा गावात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव वाढला असून दररोज अर्धेअधिक गाव अंधारातच राहत होते. साध्या कारणांमुळेही विज पुरवठा वारंवार बंद राहतो. लोड वाढल्यामुळे गावातील २ रोहित्र जळाले. परंतु दोन महिन्यापासून नवीन रोहित्र मिळाले नाही. गावात कायमस्वरुपी लाईनमन राहत नाही. यासह अनेक अडचणी ग्रामस्थांच वाढल्याने २० सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला.
त्यामुळे २० सप्टेंबर पुर्वी किन्हीराजा गावासाठी स्वतंत्र गावठाण फिडर चालू करावे, कालबाह्य झालेली सिंगलफेज योजना गावातून काढून टाकावी व नवीन थ्री फेजचे रोहित्र गावात द्यावे व भारनियमन किन्हीराजा गावात न होता सर्वच फिडरसोबत किन्हीराजा गाव चालवावे, गावात पडलेले विजेच्या तारेवरचे झोळ काढून नवीन वीज प्रवाहाचे तार टाकावे या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गोदमले, सरपंच वेणुताई जामकर, उपसरपंच संजय डिवरे व उध्दव पाटील गोडे यांच्यासह ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले होते.