शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

VIDEO - विमानतळासाठी पुरंदरमध्ये एक इंचही जागा देणार नाही

By admin | Updated: October 13, 2016 21:20 IST

दुष्काळासारख्या अस्मानी संकटातही काळ्या मातीत काबडकष्ट करून उपजिविका केली. पुरंदर उपसा योजनेमुळे जमिनी बागायती होऊन सोन्याचे दिवस आले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - दुष्काळासारख्या अस्मानी संकटातही काळ््या मातीत काबाडकष्ट करून उपजिविका केली. पुरंदर उपसा योजनेमुळे जमिनी बागायती होऊन सोन्याचे दिवस आले असताना शासनाने विमानतळाचे भूत आमच्या मानगुडीवर बसविले आहे. शेतीतून येणा-या उत्पादनावर पूर्ण पणे समाधानी आहे, त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर ताुलक्यात एक इंचही जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सात गावांतील हजारो शेतकऱ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईमध्ये पुरंदर तालुक्यात पुण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली. पंरतु विमानतळामुळे बांधित होणा-या पारगाव, राजेवाडी, आंबळे, एखतपूर, मुजवडी, खानवडी, वाघापूर या सात गावातील शेतक-यांनी जोरदार विरोध केला आहे.मोर्चात सहभागी झोलेल्या काही शेतक-यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. विमानतळासाठी सात गावातील तब्बल २४०० हेक्टर जमिन व १६६० पेक्षा अधिक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत. खानवडी हे महात्मा ज्योतीराव फुले यांचे मूळ गाव असून त्याचे स्मारकही येथे आहे. विमानतळामुळे ते इतिहास जमा होईल. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्वरुपाचे पॅकेज नको की अन्य कोणतेही आश्वासन. शेतक-यांच्या तिव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने यापुढे पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी कोणत्याही स्वरुपाचे सर्व्हेक्षण करू नये किंवा आमच्या जमिनीवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये. शेतक-यांचा विरोध डावलून विमानतळ केल्यास हजारो वेळप्रसंगी आपले प्राण देखील देतील असा इशारा शेतक-यांनी आहे. चिमुरड्याची भावनिक सादपुरंदर तालुक्यात विमानतळ झाले म्हणजे तालुक्याचा विकास होईल, भावी पिढ्यांचे कल्याण होईल, शेतक-यांना चांगले पॅकेज दिले जाईल, भूमिहीन शेतक-यांच्या मुलांना नोक-या देऊन अशी आश्वासनाची गाजर दाखवले तरी एक इंचही जागा विमानतळासाठी देणार नाही. शासनाने विरोध करून देखील विमानतळासाठी जागा घेतल्यास शेतकरी विष पिऊन आत्महत्या करतील असा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुरड्याने दिला.शेतक-यांना मनसेचा पाठिंबापुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला येथील शेतक-यांनी तिव्र विरोध केला असून, शेतक-यांच्या मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पांठिंबा देण्यात येत असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी येथे जाहीर केले. सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांनी देखील विरोध दर्शवला. परंतु हा आमचा वैयक्तिक विरोध असून, पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.विमानतळाच्या नावाला ही विरोधमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने पुरंदर तालुक्यात होणा-या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ह्यछत्रपती संभाजीराजेह्ण असे असेल असे जाहीर केले आहे. फुले,शाहू, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणा-या शासनाला ऐवढाच पुळका होतात तर विमानतळ ज्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मूळ गावात खानवडीत होत त्यांचे नावाची घोषणा करायची होती. परंतु प्रत्येक गोष्टींत शासनाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप जाधवराव यांनी येथे केला. यामुळे आता विमानतळाच्या नावावरून देखील वाद सुरु झाला आहे.