शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

VIDEO - विमानतळासाठी पुरंदरमध्ये एक इंचही जागा देणार नाही

By admin | Updated: October 13, 2016 21:20 IST

दुष्काळासारख्या अस्मानी संकटातही काळ्या मातीत काबडकष्ट करून उपजिविका केली. पुरंदर उपसा योजनेमुळे जमिनी बागायती होऊन सोन्याचे दिवस आले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - दुष्काळासारख्या अस्मानी संकटातही काळ््या मातीत काबाडकष्ट करून उपजिविका केली. पुरंदर उपसा योजनेमुळे जमिनी बागायती होऊन सोन्याचे दिवस आले असताना शासनाने विमानतळाचे भूत आमच्या मानगुडीवर बसविले आहे. शेतीतून येणा-या उत्पादनावर पूर्ण पणे समाधानी आहे, त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर ताुलक्यात एक इंचही जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सात गावांतील हजारो शेतकऱ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईमध्ये पुरंदर तालुक्यात पुण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली. पंरतु विमानतळामुळे बांधित होणा-या पारगाव, राजेवाडी, आंबळे, एखतपूर, मुजवडी, खानवडी, वाघापूर या सात गावातील शेतक-यांनी जोरदार विरोध केला आहे.मोर्चात सहभागी झोलेल्या काही शेतक-यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. विमानतळासाठी सात गावातील तब्बल २४०० हेक्टर जमिन व १६६० पेक्षा अधिक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत. खानवडी हे महात्मा ज्योतीराव फुले यांचे मूळ गाव असून त्याचे स्मारकही येथे आहे. विमानतळामुळे ते इतिहास जमा होईल. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्वरुपाचे पॅकेज नको की अन्य कोणतेही आश्वासन. शेतक-यांच्या तिव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने यापुढे पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी कोणत्याही स्वरुपाचे सर्व्हेक्षण करू नये किंवा आमच्या जमिनीवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये. शेतक-यांचा विरोध डावलून विमानतळ केल्यास हजारो वेळप्रसंगी आपले प्राण देखील देतील असा इशारा शेतक-यांनी आहे. चिमुरड्याची भावनिक सादपुरंदर तालुक्यात विमानतळ झाले म्हणजे तालुक्याचा विकास होईल, भावी पिढ्यांचे कल्याण होईल, शेतक-यांना चांगले पॅकेज दिले जाईल, भूमिहीन शेतक-यांच्या मुलांना नोक-या देऊन अशी आश्वासनाची गाजर दाखवले तरी एक इंचही जागा विमानतळासाठी देणार नाही. शासनाने विरोध करून देखील विमानतळासाठी जागा घेतल्यास शेतकरी विष पिऊन आत्महत्या करतील असा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुरड्याने दिला.शेतक-यांना मनसेचा पाठिंबापुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला येथील शेतक-यांनी तिव्र विरोध केला असून, शेतक-यांच्या मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पांठिंबा देण्यात येत असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी येथे जाहीर केले. सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे यांनी देखील विरोध दर्शवला. परंतु हा आमचा वैयक्तिक विरोध असून, पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.विमानतळाच्या नावाला ही विरोधमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने पुरंदर तालुक्यात होणा-या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ह्यछत्रपती संभाजीराजेह्ण असे असेल असे जाहीर केले आहे. फुले,शाहू, आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणा-या शासनाला ऐवढाच पुळका होतात तर विमानतळ ज्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या मूळ गावात खानवडीत होत त्यांचे नावाची घोषणा करायची होती. परंतु प्रत्येक गोष्टींत शासनाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप जाधवराव यांनी येथे केला. यामुळे आता विमानतळाच्या नावावरून देखील वाद सुरु झाला आहे.