शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

VIDEO: - पोतराजांच्या गावात 'पोतराज' आणावे लागतात बाहेरून !

By admin | Updated: July 31, 2016 13:45 IST

पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले.

प्रताप नलावडेबीड, दि. ३१ - पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. गावातील लोकांचे सामाजिक संस्थांनी केलेले प्रबोधन आणि नव्या पिढीने रूढीच्या बंधनातून स्वत:ची जाणीवपूर्वक केलेल्या सुटकेमुळे आता गावात पोतराज राहिलेलेच नाहीत.अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा गावापासून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर केरूळ हे अगदी छोटेखानी गाव आहे. गाव शंभर उंबऱ्याच. अगदी वीस वर्षापूर्वी गावातील प्रत्येक घरातून एक पोतराज म्हणून देवीची भक्ती करायचा. अंगाभोवती रंगीबेरंगी चिंध्या गुंडाळून कपाळावर कुंकवाचा भला मोठा मळवट आणि वाढलेल्या जटांचा हा पोतराज स्वत:ला यातना देत देवीची भक्ती करतो. उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारून केली जाणारी ही देवीची सेवा अंधश्रध्देतून आलेली. परंतु एक मोठा समाजाच यात अडकलेला.

केरूळा या गावातही अशाच अंधश्रध्देतून प्रत्येक घरातून एक पोतराज झालाच पाहिजे, असा वर्षा न् वर्षाचा दंडक. परंतु गावात अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. याशिवाय सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने गावातील लोकांनी आणि विशेषत: तरूणांनी स्थलांतर केले आणि पोतराज प्रथेपासून गाव मुक्त झाले. तरीही श्रध्देचा भाग म्हणून गावात आषाढ महिन्यात मरीआईची पूजा मांडलीच जाते. यासाठी मग गावात पोतराज नसल्याने आजुबाजुच्या गावातून पोतराजांना पाचारण केले जाते. 

यावेळीही असेच घडले. मरीआईच्या पूजेसाठी नगर आणि इतर ठिकाणाहून पोतराजांना गावात आणले गेले. परंतु एकेकाळी पोतराजांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची ही ओळख तरी आता पुसली गेली असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना हायसे वाटते.