शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

VIDEO : मतमोजणीवरून विरोधक आक्रमक, न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: February 26, 2017 17:55 IST

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 26 - महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले ...

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 26 - महापालिकेच्या प्रभाग १, २, ३ मध्ये मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शहरातील सर्वपक्षीय उमेदवार भाजापाविरोधातच एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाने निवडणूक प्रक्रिया प्रभावित करून लोकशाहीविरोधी कृत्य करून सत्ता मिळविल्याचा आरोप करून विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे पुरावे गोळा केले असून, या पुराव्यांसह याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.हुतात्मा स्मारक येथे पाराभूत उमेदवारांनी रविवारी (दि.२६) बैठक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्यासाठी कोर कमिटीची स्थापना केली असून या प्रकरणी सर्वपक्षीय उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. कें द्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने लोकशाही प्रक्रियेतून सर्वसामान्य नागरिकांना हद्दपार करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे निवडणुकी प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये घोळ करून अनेक मतदारांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्याचप्रमाणे इव्हीएममशीनमध्येही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय उमेदवारांनी केला आहे. इव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात कुचराई झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला असून निवडणूक आयोगाच्या नियोजनाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत ३ मार्च रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळयासमोर सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगा विरोधात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय उमेदवारांनी घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपाकलिके साठी पुन्हा मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात येणार असून यावेळी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीचे आयोजक डॉ. डीएल कऱ्हाड, संजय अपरांती यांच्यासह सर्व ३१ प्रभागांमधील पराभूत उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांपैकी २२ जणांच्या कोर कमिटीची स्थापना करण्यात आली असूनही कोर कमिटी निवडणूक अयोगाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)  

https://www.dailymotion.com/video/x844svs