शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : युतीबाबत अद्याप निर्णय नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: January 12, 2017 19:48 IST

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या ...

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या दिशेने जाणार आहे. पारदर्शी अजेंड्यावरच युती होईल. युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाणे येथे आयोजित भाजपाच्या कर्यकरणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतं होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या काही गोष्टी शिवसेनेला मान्य नसतील. त्यांच्याही काही गोष्टी आम्हाला खटकतात. शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य असतील असेही नाही. यावेळी त्यांनी नगरपालिकां निवडणुकीत भाजपावर दाखवलेल्या विश्वासबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच नगरपालिकेत आपल्याला मिळालेलं यश ही सुरवात आहे. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, आपल्याला जनतेची काम करायची आहेत असे आव्हान कार्यकर्यांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - आगामी निवडणुकीत आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे-देशातील 50 टक्के एफडीय महाराष्ट्रात- राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत, मुंबई हे देशातील पहिलं वायपाय शहर करुन दाखवलं.- आम्हाला राजकारण करायचं नसून संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. - आव्हानांचे संधीत रुपांतर केले, जलयुक्त शिवारामुळे दोन वर्षात ४ हजार गावे दुष्काळमुक्त- केंद्र सरकारकडून २५ हजार कोटी रुपये सिंचनासाठी मिळाले- काँग्रेसन शिक्षणाचं खासगीकरण आणि व्यापारीकरण केलं आहे.- विदर्भ-मराठवाड्याती पाच हजार गावांचे रुपडं बदलणार.- पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर काळ्या पैशाच्या विरोधात नियोजनबध्द पध्दतीने पावलं उचलायला सुरूवात केली- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले- गेल्या 15 वर्षात एकाही सरकारनं काम केलं नाही - समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत विकास पोहचवायचा आहे, कोणताही समाज एकमेकासमोर उभा करायचा नाही- जनतेचा विश्वास कायम ठेवू- राज्य करताना शिवराय आदर्श - महाराष्ट्रला बदलण्यासाठी हाती घेतलेलं मिशन पुर्ण करणार- महाराष्ट्रात नव्या राजकारणाला सुरुवात- जनतेने प्रत्येक निवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवावा- राज्य सरकारने ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली.- मराठा मोर्चाला सकारात्मक प्रतिसाद दिला.- मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली.- धनगर समाजालाही आरक्षण देणार .- गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विश्वाचं वातावरण निर्माण करण्यात यश.- मोदींवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवला.- नोटाबंदीच्या लढाईला सामान्य जनतेचा पाठिंबा.- 2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली.

 

https://www.dailymotion.com/video/x844o79