शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

VIDEO - लातूरमध्ये ८० मुलांना खिचडीतून विषबाधा

By admin | Updated: October 14, 2016 18:33 IST

जिल्हा परिषद शाळेतील १०० हून अधिक मुलांना मध्यान भोजनाच्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सलगरा, दि. १४ - शालेय पोषण आहाराअंतर्गतच्या वरण-भातातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास लातूर तालुक्यातील सलगरा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. 
लातूर शहरापासून २२ कि.मी. अंतरावर सलगरा (बु.) गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. शाळेतील पटसंख्या १९९ असून, शुक्रवारी १८० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी वर्ग भरले. दुपारी १.१५ वाजता दीर्घ मध्यांतर झाल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत वरण-भात देण्यात आला. 
शाळेतील तीन शिक्षकांनी या अन्नाची चव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना वरण-भाताचे वाटप सुरू झाले. काही विद्यार्थ्यांनी हे अन्न खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यातील काही विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ही माहिती गावातील नागरिकांना समजल्याने त्यांनी शाळेकडे धाव घेतली. मळमळ, उलटीचा त्रास जाणवणाºया ८० विद्यार्थ्यांना तात्काळ लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. 
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर... 
सलगराशाळेतील विद्यार्थ्यांना वरण-भात देण्यात आला होता. सर्व मुलांचे जेवण झाले होते. शेवटी शिक्षकांसमवेत एकजण जेवण करीत होता. त्याच्या ताटात पाल आढळून आली. त्यामुळे गोंधळ उडाला. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हीही तिथेच आहोत, असे लातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले. 
आम्ही चव घेतली होती... 
विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी शाळेतील तीन शिक्षकांनी अन्नाची चव घेतली होती. एका मुलाच्या ताटात पाल आढळल्यानंतर आम्ही तात्काळ भोजन वाटप बंद केले. दरम्यान, शाळेत एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला दाखल केले आहे, असे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के.बी. जाधव यांनी सांगितले. 
रुग्णालयात गर्दी... 
सलग-यातील विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने रुग्णालय परिसरात पालकांनी एकच गर्दी केली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांची धावपळ सुरू होती. रुग्णालयातील एका मोठ्या हॉलमध्ये या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.