शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

VIDEO- जमिनीला मिळाला कवडीमोल दर; धरणही उठले मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 22:06 IST

शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या

सुनील काकडे/ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 16 - शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी ८ वर्षांपूर्वी आपल्या लाखमोलाच्या जमिनी अगदीच कवडीमोल दरात धरणासाठी दिल्या. मात्र प्रारंभीपासून रेंगाळलेले धरणाचे काम, रस्त्यांअभावी शेतात जाण्याची बंद झालेली वहिवाट, खंडित असणारा विद्युत पुरवठा, धरणाच्या बुडित क्षेत्रात उगवलेली झाडे यासह असंख्य समस्यांनी फायदेशीर ठरू पाहणारे धरण अक्षरश: शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.वाशिम जिल्ह्यातील कवठळ (ता. मंगरूळपीर) येथील शेतकऱ्यांसंदर्भातील हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र त्याचे कुठलेच सोयरसुतक राहिलेले नाही. ८ वर्षांपूर्वी कवठळला सिंचन प्रकल्प मंजूर झाला. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लाखमोलाच्या जमिनी लघूसिंचनला ७० हजार रुपये प्रतिएकराने संपादित करून दिल्या. मात्र, मध्यंतरीचे सुमारे ७ वर्षं या धरणाचे काम प्रचंड प्रमाणात रेंगाळले. धरणाची भिंत उभारत असताना त्या ठिकाणी असलेली झाडे मुळासकट न उखडल्यामुळे धरणाच्या बुडित क्षेत्रात आजमितीस शंभरावर मोठी झाडे उभी झाली आहेत. यामुळे धरणाला धोका उद्भवण्यासोबतच मत्स्यव्यवसायावरही गदा आली आहे. धरणाच्या दोन्ही बाजूंनी गावातून शेतात जाण्यासाठी असलेला जुना रस्ता थातूरमातूर स्वरूपात तयार झाला. सद्या या रस्त्यावरून साधी बैलगाडी देखील जावू शकत नाही. विद्यूत पुरवठ्यासंबंधीच्या विविध समस्यांमुळेही शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत. लघूसिंचन विभागाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे...........................शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने कवडीमोल दराने शासनाला जमीन दिली. मात्र, धरणाचे काम अत्यंत बोगस झाल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत. मध्यंतरी विद्यूत खांब कोसळल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.-संजय देशमुख, शेतकरी, कवठळ