शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

VIDEO - महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केल्याची ललिताला खंत

By admin | Updated: August 24, 2016 20:03 IST

महाराष्ट्राची अॅथलिट ललिता बाबरने महाराष्ट्र सरकारने अद्यापपर्यंत दखल न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २४ - ‘मला केंद्रशासनाचा अर्जून पुरस्कार मिळाला मात्र; राज्यशासनाचा अद्याप कोणताही पुरस्कार मिळाला नसल्याची खंत रिओ आॅलिंपिक मध्ये चमकदार कामगिरी करणारी महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिने बुधवारी पुण्यात व्यक्त केली. तसेच धावपटूंना सराव सिंथेटीक ट्रॅकवर, तर स्पर्धा आॅलिम्पिक ट्रॅकवर करावी लागते. या विरोधाभासाकडे लक्ष वेधून तिने आंतरराष्ट्रीय सुविधेचा आभाव असल्याचे आधोरेखित केले. 

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ललिता बाबर हिच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ललिता म्हणाली, , देशासाठी खेळण्याचा आनंद खुप मोठा आहे. पदक मिळाले नसले तरी आंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबर खेळण्याची, त्यांच्याकडून अनुभव घेण्याची संधी मिळाली. आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होत असल्याने अनुभवाची कमी होती. या स्पर्धेत फार थोड्या फरकाने माझे पदक हुकले. मात्र, ही संधी २०२०च्या टोकिया आॅलिम्पिकमध्ये भरुन काढली जाईल. 

भारतामध्ये सर्वत्रच सिंथेटिक ट्रॅक आहेत तर आॅलिम्पिकमध्ये मोडल ट्रॅकचा वापर केला जातो. त्याचा परिणामही खेळाडूवर होऊन चार ते पाच सेकंदाचा फरकही पडत असतो. आॅलिम्पिकसाठी चार वर्षे सिंथेटिकवर सराव केल्यानंतर खेळाडूला आॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावावे लागते. त्यामुळे त्याबाबतची सुविधाही भारतामध्ये निर्माण करता आली तरी पदकाची संख्या वाढेल. भारतात सुविधा नाहीत, असे नाही; पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळायला हव्यात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक स्पर्धेसाठी मिळत नाही. सराव वेगळ्या ट्रॅकवर आणि स्पर्धा वेगळ्या ट्रॅकवर या परिस्थितीचा आम्हाला सामना करावा लागतो. खेळाडू एवढी मेहनत घेत असतो. तेव्हा त्याला सुविधाही तशा मिळायला हव्यात असेही ती म्हणाली.अथलेटिक्स संघटनेकडून दुर्लक्ष रिओहून परतल्यानंतर महाराष्ट्र आॅलिंपिक संघटना आणि ज्या संघटनेसाठी आपण खेळतो त्या अ‍ॅथलेटिक्स संघटने मधील एकही पदाधिकारी आपल्या स्वागतासाठी आला नसल्याची जाहीर नाराजीही तीने व्यक्त केली.त्यांच्यासाठी आम्ही राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असतो. खेळाडूंना संघटनेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो अशा शब्दात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच स्पर्धेहून आल्यानंतर खेळांडूवर बक्षिसांचा वर्षाव होतो. मात्र, त्या स्पर्धेला जाण्यापूर्वी चांगल्या सुविधांसाठी हा खर्च केल्यास खेळाडूंना त्याचा फायदा होईल. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली. जैशा बाबत घडलेला प्रकार चुकीचा धावपटू ओ. पी. जैशाने रिओ मॅरेथॉनमध्ये आपल्याला पाणीही मिळाले नसल्याचा आरोप केला. याबाबत विचारले असता ललिता म्हणाली, की त्या वेळी नेमके काय घडले हे मला माहिती नाही. मी माझ्या शर्यर्तीवर लक्ष केंद्रित केले होते. माझे लक्ष विचलीत होऊ नये, यासाठी हे प्रकरण माझ्या पासून लांब ठेवण्यात आले. पण तिला पाणी मिळाले नसेल, तर हे चुकीचेच आहे. अशा स्पर्धांमध्ये खूप धावावे लागते. त्यामुळे पाणी आणि एनर्जी ड्रींकची काही ठरावित अंतरानंतर गरज असते. त्यामुळे जैशा बाबत घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा असल्याचे ललिता बाबरने स्पष्ट केले. सुवर्णयुग मित्रमंडळाकडून एक लाखांचा पुरस्कार रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिला धनकवडीतील श्री सुवर्णयुग तरुण मंडळाने एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ललिता बाबर हिच्याशी वातार्लाप कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यानंतर तिला गौरविण्यात आले. उद्योजक गणेश भिंताडे, निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी, गणेश दिघे या वेळी उपस्थित होते.