शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

VIDEO : 'काळू-बाळू’चा तमाशा फड पुन्हा मैदानात!

By admin | Updated: October 14, 2016 14:35 IST

चटकेबाज विनोदांची बतावणी, ढोलकीवरील अस्सल लावणी आणि सुपरहिट वगांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा काळू-बाळूचा लोकनाट्य तमाशा अखेर पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे.

- सचिन लाड, ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १४ - चटकेबाज विनोदांची बतावणी, ढोलकीवरील अस्सल लावणी आणि सुपरहिट वगांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळूचा लोकनाट्य तमाशा अखेर पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे. तब्बल पाच दशके हुकूमत गाजविणारा हा फड दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आल्याने गतवर्षी पूर्णपणे बंद होता. यंदा मात्र हंगाम ‘मारण्याच्या’ तयारीने जोमाने सराव सुरू आहे. पुढील आठवड्यात कवलापूर या जन्मगावी पुन्हा ‘श्रीगणेशा’ करून हा फड मराठवाड्यात रवाना होणार आहे.
अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे आणि लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचे आजोबा सातू-हिरू यांनी हा तमाशाचा फड सुरू केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. तमाशाची कला जोपासण्यासाठी ‘काळू-बाळू’ची तिसरी पिढीही यात उतरली. त्यांनी महाराष्टÑासह दिल्लीही जिंकली आणि त्यांच्याच नावाने फड प्रसिद्ध झाला. दोन वर्षांपूर्वी काळू-बाळू ही जोडी दोन वर्षाच्या अंतराने पडद्याआड गेली. आता त्यांच्या पुढच्या पिढीने लोकनाट्याचा बाज सांभाळण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल ५५ वर्षे ‘लोकनाट्य तमाशा’ हेच दैवत मानून सांगली जिल्हा पर्यायाने कवलापूरचे नाव देशाच्या कानाकोपºयात नेणारा हा फड गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील दुष्काळी परिस्थिती व आर्थिक संकटामुळे अडचणीत होता. प्रतत्येकवर्षी विजयादशमीला (दसरा) हा फड गावाबाहेर पडतो. तेथून मे महिन्यातील अक्षयतृतीयेपर्यंत सव्वादोनशे प्रयोग केले जातात. तत्पूर्वी कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाद्ये आणि वाहनांची दुरुस्ती, रंगमंच, वीज-जनरेटर व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान २५ ते ३० लाख रुपये लागतात. दोन वर्षांपासून ही रक्कम गोळा करण्यात या फडाला अडचणी येत होत्या. त्यामुळे २०१४ मध्ये विजयादशमीला त्यांना बाहेर पडता आले नाही. ग्रामस्थांनी थोडी वर्गणी गोळा करून दिली. त्या जोरावर त्यांनी फड उभा करून १५ डिसेंबर २०१४ ला ‘पहिले नमन’ केले होतेे. मे २०१५ मध्ये हंगाम संपल्यानंतर फड कवलापूर मुक्कामी आला. २०१५ मध्ये नेहमीप्रमाणे विजयादशमीला बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता, पण आर्थिक बाजूने मार बसला. शिवाय राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती होती. त्यामुळे त्यांना गावातच थांबावे लागले.
पिढ्यान् पिढ्या सुरू असलेला हा तमाशा बंद ठेवण्याची गतवर्षी पहिल्यांदाच वेळ आली. ऐन हंगामात ते गावातच होते. खेळ सुरू न झाल्याची सल त्यांना टोचत राहिली. फड बंद झाला पण तो कायमचा नाही, तो पुन्हा उभारण्याचा त्यांच्या पिढीचा प्रयत्न होता. महागाई वाढली आहे. चार ट्रक, दोन जीप-बस-ट्रकचे डिझेल, शंभरहून अधिक कलाकारांचा पगार, त्यांचा चहा, नाष्टा व जेवणाच्या खर्चाचा मेळ घालताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यावर्षी मे महिन्यापासूनच त्यांनी आर्थिक बाजू भक्कम करण्याची तयारी सुरू केली. यात त्यांना यशही आले. प्रथम त्यांनी तीन ट्रक दुरुस्तीला सोडले. दुरुस्ती झाल्यानंतर त्यांचे रंगकाम केले. अन्य वाहनांचीही दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर कलाकारांची जुळवा-जुळव केली. सांगली, सातारा, इचलकरंजी, पुणे, नाशिक, जालना, बीड, भूम, परांडा (जि. उस्मानाबाद), कर्नाटक येथून कलाकार, तसेच कर्मचारी सात महिन्यांच्या करारावर घेतले. १६ नृत्यांगना, ३० इतर कलाकार यांच्यासह चालक, क्लिनर, आचारी असा ९६ जणांचा लवाजमा आता तयार झाला आहे. यात अनेक वर्षांपासून काम करणारे जुने कलाकारही मिळाले आहेत.
 
 
अनंतचतुर्दशीला सराव सुरू
कवलापूर शेजारच्या बुधगाव येथे संस्थानकालीन राजवाडा परिसरात अनंतचतुर्दशीला सरावाची तालीम सुरू केली आहे. लावण्या, हिंदी-मराठी चित्रपटांतील गाणी, गण-गवळण, बतावणी, वगनाट्य यांचा दिवसभर सराव सुरू आहे. नवीन साहित्याची जुळवाजुळवही केली आहे. कलाकारांच्या कपड्यांची नव्याने खरेदी केली आहे. जुने कपडे धुतले जात आहेत. नेहमीप्रमाणे विजयादशमीला बाहेर पडण्याचा प्रयत्न होता, पण दोन वाहनांचे रंगकाम पूर्ण झाले नसल्याने दौरा लांबणीवर पडला आहे, असे तमाशाचे फडप्रमुख संपत खाडे यांनी सांगितले.
 
 
जन्मभूमीत ‘श्रीगणेशा’
कवलापूर या जन्मगावी पुन्हा ‘श्रीगणेशा’ करून तमाशाचा फड पुढील दौºयासाठी रवाना होणार आहे. वाहनांचे रंगकाम पूर्ण होताच कवलापुरात पहिला खेळ केला जाणार आहे. कदाचित पुढील आठवड्यात याचे नियोजन होईल. त्यानंतर त्याच रात्री हा फड मराठवाड्यात जाईल. डिसेंबरपर्यंत या फडाचा विदर्भ, मराठवाड्यात मुक्काम असतो. तीन महिने दररोज प्रयोग सुरू असतात. गेली दोन वर्षे तेथील हंगामाला हा फड मुकला होता.