शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

VIDEO: वर्ध्यात धावत्या कंटेनरला आग, नऊ नव्या को-या कार भस्मसात

By admin | Updated: October 16, 2016 18:47 IST

नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक

वर्धा - नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा-यवतमाळ बायपास मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक व क्लिनरने वेळीच कंटेनर सोडल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भागीचा भडका जसजसा उडत होता. तसतसा त्यातील कारच्या टायरचा स्फोट होत होता. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ उठत असल्यामुळे ते निष्फळ ठरले. आग विझवतपर्यंत कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून राख झाल्या होत्या. यावेळी बघ्याची तोबा गर्दी झाली होती. 
चेन्नई येथून ह्युंदाई कंपनीच्या नऊ नवीन कार घेऊन कंटेनर क्र. एचआर ५५ एम ०९४८ हा छत्तीसगड राज्यातील कोरबा येथे वर्धा मार्गे जात होता. वर्धा बायपासवर येताच खड्ड्यांमुळे कंटेनरच्या कॅबीनमधील बॅटरीचे वायर शॉट झाले. वायरिंग पेटत असल्याची बाब चालक अवधेशकुमार पाल (२५) व क्लिनर सोनू पाल (१८) दोघेही रा. अलाहाबाद यांच्या लक्षात आली. आग भडकत असल्याचे बघून त्यांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला  आणि त्यातून उडी घेऊन बाहेर पडले. क्षणार्धात आगीने कॅबीनचा ताबा घेतला. पाठोपाठ समोरचे टायरही आगीने कवेत घेतले. बघता बघता संपूर्ण कंटेनरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.  टायर, डिझेल टँकसह ब्रेक आॅईल जळत असल्याने आगीची तीव्रता वाढतच गेली. यानंतर कंटेनरमधील नव्या कोऱ्या कारनेही पेट घेतला. वर्धा नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल होईपर्यंत निम्मेअधिक कंटेनर जळाले होते. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न केला.  कंटेनरच्या पूढच्या भागातील आग विझली; पण कंटेनरमधील कार जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. कंटेनरचे दार उघडताच आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. अखेर संपूर्ण कंटेनर आणि त्यातील नऊ कार जळून खाक झाल्या. यात सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. दोन्ही बाजूची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
बघ्यांची तोबा गर्दी-
दी बर्निंग कंटेनर पाहण्याकरिता परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी पोलीस व अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली, तर काही केवळ दृश्य व व्हिडीओ टिपण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले. 
 
दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा-
या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा बायपास मार्गावर सावंगी टी पॉर्इंटपासून तर दत्तपूर चौकापर्यंत अशा सुमारे तीन कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे जडवाहतुक वर्धा शहरातून वळती करण्यात आली होती.