शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

VIDEO: वर्ध्यात धावत्या कंटेनरला आग, नऊ नव्या को-या कार भस्मसात

By admin | Updated: October 16, 2016 18:47 IST

नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक

वर्धा - नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा-यवतमाळ बायपास मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक व क्लिनरने वेळीच कंटेनर सोडल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भागीचा भडका जसजसा उडत होता. तसतसा त्यातील कारच्या टायरचा स्फोट होत होता. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ उठत असल्यामुळे ते निष्फळ ठरले. आग विझवतपर्यंत कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून राख झाल्या होत्या. यावेळी बघ्याची तोबा गर्दी झाली होती. 
चेन्नई येथून ह्युंदाई कंपनीच्या नऊ नवीन कार घेऊन कंटेनर क्र. एचआर ५५ एम ०९४८ हा छत्तीसगड राज्यातील कोरबा येथे वर्धा मार्गे जात होता. वर्धा बायपासवर येताच खड्ड्यांमुळे कंटेनरच्या कॅबीनमधील बॅटरीचे वायर शॉट झाले. वायरिंग पेटत असल्याची बाब चालक अवधेशकुमार पाल (२५) व क्लिनर सोनू पाल (१८) दोघेही रा. अलाहाबाद यांच्या लक्षात आली. आग भडकत असल्याचे बघून त्यांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला  आणि त्यातून उडी घेऊन बाहेर पडले. क्षणार्धात आगीने कॅबीनचा ताबा घेतला. पाठोपाठ समोरचे टायरही आगीने कवेत घेतले. बघता बघता संपूर्ण कंटेनरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.  टायर, डिझेल टँकसह ब्रेक आॅईल जळत असल्याने आगीची तीव्रता वाढतच गेली. यानंतर कंटेनरमधील नव्या कोऱ्या कारनेही पेट घेतला. वर्धा नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल होईपर्यंत निम्मेअधिक कंटेनर जळाले होते. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न केला.  कंटेनरच्या पूढच्या भागातील आग विझली; पण कंटेनरमधील कार जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. कंटेनरचे दार उघडताच आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. अखेर संपूर्ण कंटेनर आणि त्यातील नऊ कार जळून खाक झाल्या. यात सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. दोन्ही बाजूची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
बघ्यांची तोबा गर्दी-
दी बर्निंग कंटेनर पाहण्याकरिता परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी पोलीस व अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली, तर काही केवळ दृश्य व व्हिडीओ टिपण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले. 
 
दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा-
या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा बायपास मार्गावर सावंगी टी पॉर्इंटपासून तर दत्तपूर चौकापर्यंत अशा सुमारे तीन कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे जडवाहतुक वर्धा शहरातून वळती करण्यात आली होती.