शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

VIDEO: वर्ध्यात धावत्या कंटेनरला आग, नऊ नव्या को-या कार भस्मसात

By admin | Updated: October 16, 2016 18:47 IST

नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक

वर्धा - नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक झाल्या. ही घटना वर्धा-यवतमाळ बायपास मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक व क्लिनरने वेळीच कंटेनर सोडल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भागीचा भडका जसजसा उडत होता. तसतसा त्यातील कारच्या टायरचा स्फोट होत होता. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ उठत असल्यामुळे ते निष्फळ ठरले. आग विझवतपर्यंत कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून राख झाल्या होत्या. यावेळी बघ्याची तोबा गर्दी झाली होती. 
चेन्नई येथून ह्युंदाई कंपनीच्या नऊ नवीन कार घेऊन कंटेनर क्र. एचआर ५५ एम ०९४८ हा छत्तीसगड राज्यातील कोरबा येथे वर्धा मार्गे जात होता. वर्धा बायपासवर येताच खड्ड्यांमुळे कंटेनरच्या कॅबीनमधील बॅटरीचे वायर शॉट झाले. वायरिंग पेटत असल्याची बाब चालक अवधेशकुमार पाल (२५) व क्लिनर सोनू पाल (१८) दोघेही रा. अलाहाबाद यांच्या लक्षात आली. आग भडकत असल्याचे बघून त्यांनी कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा केला  आणि त्यातून उडी घेऊन बाहेर पडले. क्षणार्धात आगीने कॅबीनचा ताबा घेतला. पाठोपाठ समोरचे टायरही आगीने कवेत घेतले. बघता बघता संपूर्ण कंटेनरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.  टायर, डिझेल टँकसह ब्रेक आॅईल जळत असल्याने आगीची तीव्रता वाढतच गेली. यानंतर कंटेनरमधील नव्या कोऱ्या कारनेही पेट घेतला. वर्धा नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल होईपर्यंत निम्मेअधिक कंटेनर जळाले होते. अग्निशामक दलाने घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न केला.  कंटेनरच्या पूढच्या भागातील आग विझली; पण कंटेनरमधील कार जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. कंटेनरचे दार उघडताच आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. अखेर संपूर्ण कंटेनर आणि त्यातील नऊ कार जळून खाक झाल्या. यात सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीवर नियंत्रण मिळविले. दोन्ही बाजूची वाहतूक नियंत्रित करण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 
बघ्यांची तोबा गर्दी-
दी बर्निंग कंटेनर पाहण्याकरिता परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी पोलीस व अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली, तर काही केवळ दृश्य व व्हिडीओ टिपण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले. 
 
दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा-
या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा बायपास मार्गावर सावंगी टी पॉर्इंटपासून तर दत्तपूर चौकापर्यंत अशा सुमारे तीन कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे जडवाहतुक वर्धा शहरातून वळती करण्यात आली होती.