शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खास व-हाडी ठसक्यात होतेय सुगंधी उटण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 11:24 IST

मांगल्याचे प्रतीक असणा-या दिवाळीची चाहूल लागली असून, या दिवाळीत विशेष महत्त्व असणा-या सुगंधी उटण्यांना मागणी वाढली आहे.

राम देशपांडे, ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २५ -  मांगल्याचे प्रतीक असणा-या दिवाळीची चाहूल लागली असून, या दिवाळीत विशेष महत्त्व असणा-या सुगंधी उटण्यांना मागणी वाढली आहे. दिवाळीत अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व असल्याने, विक्रीकरिता उपलब्ध झालेल्या वनौषधीयुक्त उटण्याचा सुगंध अकोल्याच्या बाजारपेठेत दरवळत आहे. विक्रेतेसुद्धा खास वºहाडी ठसक्यात गीते सादर करून उटणे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. 

दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. तसेच हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून लावावे, असा नियम आहे. उटणे दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावले जाते. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते तर उटण्यामुळे ती राखली जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिवाळी पर्वात ब्रह्मंडात तेज, आप आणि वायुयुक्त चैतन्यप्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायुमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या-त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा यासाठी या काळात तेज, आप आणि वायुवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्याची संवेदनशीलता वाढवली जाते. अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. अभ्यंग म्हणजे पायापासून डोळ्याच्या दिशेने तेल लावणे होय. हे स्नान दिवाळी ते संक्रांत असे चार महिने करावे, असे आयुर्वेद सांगते. अभ्यंगस्नान हे तिळाच्या तेलापासून केले जाते. तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे तिचे गुण आत्मसात करते. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते, ते शरीराचा ताण शिथिल करते.
चंदन, गुलाब, मोगरा, कापूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबीहळद, बावची, कचुरा वडा, दवणा, मारवा आदी वनौषधी एकत्रित करून तयार केलेले सुगंधी उटणे अकोल्याच्या बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध झाले असून, ‘अंगाले लावा.. तोंडाले लावा..’ अशा खास वºहाडी ठसक्यात उटणं विक्रेते गीते सादर करून, ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त सजलेल्या बाजारपेठेत, उटण्याचा सुगंध अधिकच चैतन्य निर्माण करीत आहे.