शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

VIDEO : नाशिकमध्ये यांत्रिकीकरणामुळे मुरमुरा व्यवसायावर संक्रात

By admin | Updated: August 9, 2016 10:17 IST

घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

सुनील शिंदे
ऑनलाइन लोकमत
घोटी(नाशिक), दि. ९ -  घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही  मुरमुरा भट्टयांनी बदलत्या काळात या व्यावसायाचेही यांत्रिकीकरण झाल्याने हा व्यवसाय संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर आहे.भातावर प्रक्रिया करून तांदूळ निर्मितीसाठी भात मिला उभ्या राहिल्या आणि भाताच्या गिरणीची घरघर बंद झाली.तसेच यांत्रिकीकरणा मुळे मध्यरात्री सुरु होऊन सकाळी संपणारा हा कायमचा संपण्याच्या मार्गावर आहे.यामुळे मुरमुरा निर्मिती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
    पावसाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पन्नास वर्षापूर्वी प्रचंड आणि मुसळधार पाऊस होत असल्याने,तसेच तालुक्याचे वातावरण भात पिकाला पोषक असल्याने भाताचे विक्रमी उत्पादन होत असे.केवळ सेंद्रीय खताचा वापर होत असल्याने या भाताला सर्वत्र जोरदार मागणी होत होती.यातच भाताचे गरि कोळपी हे वाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तांदळाला प्रचंड मागणी असल्याने घोटी बाजारपेठ याच तांदळासाठी प्रसिद्ध झाली.आणि यामुळे भाताचे सर्वत्र प्रचंड उत्पादन होऊ लागले.या भातावर प्रक्रिया करणारे अनेक लघु उद्योग त्याच काळात घोटी शहरात उभे राहिले.भातापासून तांदूळ निर्मिती व भातापासून मुरमुरा निर्मिती अशा दोन प्रमुख व्यवसायाने मात्र घोटी शहराला नावलौकिक मिळवून दिला. एकट्या घोटी शहरात त्यावेळी मुरमुरा निर्मिती करणाऱ्या शेकडो भट्ट्या उभ्या राहिल्या.या भट्ट्यानी अनेक जणांना रोजगार,तर अनेकांना मान,सन्मान,व प्रतिष्टा मिळवून दिली.या उद्योगांनी हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हळू हळू तालुक्यात धरणाची निर्मिती होऊ लागली.यामुळे शेतकऱ्यांनी भात उत्पादनाला दुय्यम स्थान देत बागायती,व संकरित भाताच्या बियाणाला अधिक प्राधान्य देत,कमी वेळेत,कमी भांडवलात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीकडे अधिक कल दिल्याने भाताच्या उत्पादनात कमालीची घट झाली.परिणामी यावर अवलंबून असणारे अनेक लघु उद्योग धोक्यात आले.हा उद्योग धोक्यात येण्याची अनेक कारणे आहेत.मुरमुरा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत तसेच मजुरीत वाढ झाल्याने हा खर्च व मिळणारा नफा यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजुरावर,व इतर घटकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.तरीही परिस्थितीवर मात करीत व मुरमुरा व्यवसायाच्या यांत्रिकीकरणाशी स्पर्धा करीत अनेकांनी हा व्यवसाय अद्यापही शाबूत ठेवला आहे.
  पारंपारिक मुरमुरा भट्टीत एक पोते भातापासून साधारणता आठ पोते मुरमुरा निर्माण होते.यातून भात खरेदी,मजुरी,मेहनत व इतर खर्च वगळता मालकाच्या हातात अत्यल्प नफा मिळत असतानाही या व्यवसायाचे अस्तित्व जतन करण्यासाठी घोटीतील भट्टी मालकाची केविलवाणी धडपड चालू आहे. भांडवलदाराच्या लहान उद्योगासाठीही शासन व वित्तीय संस्था आर्थिक पाठबळ देऊन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करते परंतु गेली पन्नास वर्षापासून पारंपारिक असलेल्या या व्यवसायाची ना शासनाने दाखल घेतली ना वित्तीय संस्थांनी. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
 
 अशी होते मुरमुरा निर्मिती :-
  मुरमु-यासाठी आवश्यक असणाऱ्या भाताला सर्वप्रथम पाण्याच्या हौदात भिजत घातले जाते.पूर्णपणे भात भिजल्यानंतर या हौदातील पाणी काढून भात पूर्णपणे सुकविले जाते. तसेच हे भात गरम उकळत्या पाण्यात टाकून काढले जाते. हे भात सुकल्यानंतर गिरणीतून त्याचे तांदूळ काढले जातात.या तांदळाला एक कामगार मिठाचे पाणी लावून दुसऱ्या कामगाराकडे देतो. हा कामगार हे तांदूळ गरम कढईत मिठ व तांदूळ एकजीव करण्यासाठी गरम करतो.एकजीव केलेले तांदूळ या भट्टीचा मुख्य कारागीर समुद्राच्या गरम रेतीत टाकतो. आणि याच ठिकाणी तांदळापासून मुरमुरा तयार होतो. हा मुरमुरा चाळून बारदानाच्या अथवा प्लास्टिकच्या पोत्यात भरला जातो.