शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

VIDEO : बीबी का मकब-याचे अभिजात सौंदर्य लयास जाताना...

By admin | Updated: July 5, 2017 18:41 IST

- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत   औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची ...

- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत
 
औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणा-या बीबी का मकब-याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे. 
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकब-याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणा-या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकब-याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.
मकब-याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही  तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे. 
शहेनशहा औरंगजेबचा मुलगा आजमशहाने आई रबिया-उल-दुर्राणी ऊर्फ दिलरसबानो बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. समाधीची मुख्य इमारत १९ फूट उंच आणि  ७२ फूट लांबीच्या चौरसाकृती विशाल ओट्यावर उभी आहे. मकब-याच्या अनन्यसाधारण सौंदर्यात भर घालण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. मकब-याच्या निर्मितीसाठी लाल आणि काळे दगड, संगमरवर आणि स्टको प्लॅस्टर (गिलावा) वापरण्यात आले आहे. भिंतीवरील स्टको प्लॅस्टरवरील नक्षीकाम मकब-याचे प्रमुख आकर्षण आहे. 
मात्र, आता या गिलाव्याचे पापुदे्र वातावरणाचा मारा आणि भारतीय सर्वेक्षण खात्याच्या उदासीनतेने गळून पडत आहेत. संगमरवराचा शुभ्र परिणाम साधण्यासाठी वापरलेला गिलावा निघाल्यामुळे आतील दगड  दिसत आहेत. पावसाचा मारा आणि  पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भिंती काळ्या पडत आहेत. पांढ-या मकब-यावर जागोजागी काळे ठिपके पडल्याने त्याचे सौंदर्यच बाधित झाले आहे. समाधीच्या चारही कोप-यांवर आकर्षक नक्षीकामाने नटलेल्या अष्टकोनी मिना-यांचेदेखील हेच हाल आहेत.
मुघलकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून बीबी का मकबरा ओळखला जातो. देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्तुती आणि वर्णन ऐकून पर्यटक मोठ्या अपेक्षा ठेवून येथे येतात; पण येथील वाताहत पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो हे नक्की. 
 
मकब-याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शायर बशर नवाज लिहितात, 
‘मकबरा गुस्ल करे नूर की फुहारो में, 
रक्स करती रहे नकहत (खुशबू), 
इन्हीं गुलजारों में.’ 
 
 
आज खरंच अशी परिस्थिती आहे?
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
मकबरा निर्माण होऊन साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षे झाल्याने वास्तूची झीज होणे स्वाभाविक आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणेदेखील शक्य आहे. देशातील महत्त्वाच्या स्थळांपैकी एक असणाºया बीबी का मकबºयाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. मकबºयाच्या उंचवट्यावरील लाल दगडाचे कठडे अनेक ठिकाणी मोडले आहेत, तर काही चिरे कधीही पडतील, अशा धोकादायक स्थितीत आहेत. त्यावर कायमस्वरूपी इलाज करण्याऐवजी तात्पुरता डागडुजीचा उपाय केला जातो.  तारा आणि पाईपने कठडे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
इतिहासप्रेमींनी समोर येण्याची गरज
औरंगाबादचे मुख्य पर्यटन आकर्षण असणा-या बीबी का मकब-याच्या संवर्धनासाठी शहरवासीयांना एकत्र येण्याची गरज आहे. जर अशीच वाताहत सुरू राहणार असेल तर शहरातील इतर अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मकबरादेखील एक शोकांतिका बनून राहील. ज्याप्रमाणे ताज महालाच्या संवर्धनासाठी, सौंदर्यकरणासाठी मेहनत घेतली जाते तसे मकबºयाच्या बाबतीत का प्रयत्न केले जात नाही? असा सवाल इतिहासप्रेमी विचारत आहेत. मकबºयाला गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादकरांनी आत्मपरीक्षण करून एकत्र येण्याची गरज आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x84577e