शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

VIDEO : बीबी का मकब-याचे अभिजात सौंदर्य लयास जाताना...

By admin | Updated: July 5, 2017 18:41 IST

- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत   औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची ...

- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत
 
औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणा-या बीबी का मकब-याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे. 
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकब-याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणा-या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकब-याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.
मकब-याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही  तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे. 
शहेनशहा औरंगजेबचा मुलगा आजमशहाने आई रबिया-उल-दुर्राणी ऊर्फ दिलरसबानो बेगम हिच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला. समाधीची मुख्य इमारत १९ फूट उंच आणि  ७२ फूट लांबीच्या चौरसाकृती विशाल ओट्यावर उभी आहे. मकब-याच्या अनन्यसाधारण सौंदर्यात भर घालण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. मकब-याच्या निर्मितीसाठी लाल आणि काळे दगड, संगमरवर आणि स्टको प्लॅस्टर (गिलावा) वापरण्यात आले आहे. भिंतीवरील स्टको प्लॅस्टरवरील नक्षीकाम मकब-याचे प्रमुख आकर्षण आहे. 
मात्र, आता या गिलाव्याचे पापुदे्र वातावरणाचा मारा आणि भारतीय सर्वेक्षण खात्याच्या उदासीनतेने गळून पडत आहेत. संगमरवराचा शुभ्र परिणाम साधण्यासाठी वापरलेला गिलावा निघाल्यामुळे आतील दगड  दिसत आहेत. पावसाचा मारा आणि  पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भिंती काळ्या पडत आहेत. पांढ-या मकब-यावर जागोजागी काळे ठिपके पडल्याने त्याचे सौंदर्यच बाधित झाले आहे. समाधीच्या चारही कोप-यांवर आकर्षक नक्षीकामाने नटलेल्या अष्टकोनी मिना-यांचेदेखील हेच हाल आहेत.
मुघलकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून बीबी का मकबरा ओळखला जातो. देशविदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. स्तुती आणि वर्णन ऐकून पर्यटक मोठ्या अपेक्षा ठेवून येथे येतात; पण येथील वाताहत पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो हे नक्की. 
 
मकब-याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शायर बशर नवाज लिहितात, 
‘मकबरा गुस्ल करे नूर की फुहारो में, 
रक्स करती रहे नकहत (खुशबू), 
इन्हीं गुलजारों में.’ 
 
 
आज खरंच अशी परिस्थिती आहे?
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
मकबरा निर्माण होऊन साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षे झाल्याने वास्तूची झीज होणे स्वाभाविक आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणेदेखील शक्य आहे. देशातील महत्त्वाच्या स्थळांपैकी एक असणाºया बीबी का मकबºयाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. मकबºयाच्या उंचवट्यावरील लाल दगडाचे कठडे अनेक ठिकाणी मोडले आहेत, तर काही चिरे कधीही पडतील, अशा धोकादायक स्थितीत आहेत. त्यावर कायमस्वरूपी इलाज करण्याऐवजी तात्पुरता डागडुजीचा उपाय केला जातो.  तारा आणि पाईपने कठडे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
इतिहासप्रेमींनी समोर येण्याची गरज
औरंगाबादचे मुख्य पर्यटन आकर्षण असणा-या बीबी का मकब-याच्या संवर्धनासाठी शहरवासीयांना एकत्र येण्याची गरज आहे. जर अशीच वाताहत सुरू राहणार असेल तर शहरातील इतर अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मकबरादेखील एक शोकांतिका बनून राहील. ज्याप्रमाणे ताज महालाच्या संवर्धनासाठी, सौंदर्यकरणासाठी मेहनत घेतली जाते तसे मकबºयाच्या बाबतीत का प्रयत्न केले जात नाही? असा सवाल इतिहासप्रेमी विचारत आहेत. मकबºयाला गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादकरांनी आत्मपरीक्षण करून एकत्र येण्याची गरज आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x84577e