शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचे भाग्य उजळले !

By admin | Updated: December 8, 2014 02:35 IST

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत,

अतुल कुलकर्णी, मुंबईविदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत, यासाठी लागणाऱ्या मान्यता व इतर बाबींची पूर्तता तत्काळ करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.‘सब घोडे बारा टका’ असे न करता ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांना आधी पूर्ण करण्याचे राजकीय धाडस दाखवा, असे आवाहन करीत ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला होता. याविषयीची विस्तृत आकडेवारीही ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाशित केली होती. मात्र केवळ विदर्भातील प्रकल्पांना हा न्याय न देता राज्यातील सगळ्याच प्रलंबित प्रकल्पांना हा निकष लावला, तरच राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामास गती मिळेल अन्यथा अन्य विभागांतील प्रकल्पांचा अनुशेष वाढत जाईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विदभार्तील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जलसंपदा प्रकल्प व सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला या वेळी उपस्थित होते. कृती कार्यक्रम काय असावा, याबाबत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की पाटबंधारे प्रकल्पांना लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया जलद करण्यात यावी तसेच वनजमिनींची मान्यता, भूसंपादन, जमिनीचे हस्तांतरण, उपलब्ध निधीचा वापर प्राथम्यक्रमाच्या प्रकल्पांवर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात व आवश्यक त्या ठिकाणी अधिकारांचे विकेंद्रीकरण करून क्षेत्रीय स्तरावर हे अधिकार हस्तांतरीत करावेत. यामुळे निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टळून प्रकल्प पूर्ण होण्यास वेळही कमी होईल.