शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचे भाग्य उजळले !

By admin | Updated: December 8, 2014 02:35 IST

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत,

अतुल कुलकर्णी, मुंबईविदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच ७५ टक्के आर्थिक गुंतवणूक झाली आहे, असे प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून येत्या दोन वर्षांत पूर्ण करावेत, यासाठी लागणाऱ्या मान्यता व इतर बाबींची पूर्तता तत्काळ करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.‘सब घोडे बारा टका’ असे न करता ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांना आधी पूर्ण करण्याचे राजकीय धाडस दाखवा, असे आवाहन करीत ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला होता. याविषयीची विस्तृत आकडेवारीही ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाशित केली होती. मात्र केवळ विदर्भातील प्रकल्पांना हा न्याय न देता राज्यातील सगळ्याच प्रलंबित प्रकल्पांना हा निकष लावला, तरच राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामास गती मिळेल अन्यथा अन्य विभागांतील प्रकल्पांचा अनुशेष वाढत जाईल, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विदभार्तील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जलसंपदा प्रकल्प व सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला या वेळी उपस्थित होते. कृती कार्यक्रम काय असावा, याबाबत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की पाटबंधारे प्रकल्पांना लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया जलद करण्यात यावी तसेच वनजमिनींची मान्यता, भूसंपादन, जमिनीचे हस्तांतरण, उपलब्ध निधीचा वापर प्राथम्यक्रमाच्या प्रकल्पांवर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात व आवश्यक त्या ठिकाणी अधिकारांचे विकेंद्रीकरण करून क्षेत्रीय स्तरावर हे अधिकार हस्तांतरीत करावेत. यामुळे निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टळून प्रकल्प पूर्ण होण्यास वेळही कमी होईल.