शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘विदर्भ वैधानिक’च्या शिफारशी दुर्लक्षित

By admin | Updated: May 28, 2014 00:53 IST

विदर्भातील मागासलेपणा दूर करण्यासाठी, राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. यात तज्ज्ञ मंडळींची सदस्य म्हणून नियुक्ती करून, विदर्भातील अनुशेषासंदर्भात त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण

तज्ज्ञांच्या अभ्यासाचा फायदा काय? : राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना

नागपूर : विदर्भातील मागासलेपणा दूर करण्यासाठी, राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. यात तज्ज्ञ मंडळींची सदस्य म्हणून नियुक्ती करून, विदर्भातील अनुशेषासंदर्भात त्यांच्याकडून अभ्यासपूर्ण अहवाल मागविले. तज्ज्ञांनी अहवालातून सूचविलेल्या शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सरकार करीत आहे. विदर्भ वैधानिक मंडळाच्या जवळपास शेकडो शिफारशीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.

विदर्भ वैधानिक विकास मंडळाने विविध क्षेत्रांतील अनुशेषाबाबतचे १९ अहवाल १९९४ ते २0१३ च्या कालावधीत सादर केले आहे. अहवालाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी शासनपातळीवर होऊ शकली नाही. हे अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे तज्ज्ञांची समिती मंडळात हवीच कशाला?, समितीच्या अभ्यासाचा कोणताही उपयोग विदर्भाच्या विकासासाठी होत नाही तर मग राज्यपालांचा अभ्यास समितीवरच जोर का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विदर्भ वैधानिक मंडळ अस्तित्वात आल्यापासून २0१0 पर्यंतचा काळ बरा गेला. कारण एक लोकप्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षपदी होता. त्यामुळे मंडळावर वचक होता. नंतर निधी बंद झाला व सर्व काही संपले. मंडळाला अहवाल तयार करणे व थातूरमातूर बैठका घेणे याशिवाय कामच उरले नाही. मंडळाला कुणी वाली नसल्याने मंडळाचे अस्तित्वच संपुष्टात येते की काय, अशी स्थिती आहे. २0१५ पर्यंत राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ मिळाली आहे.

राकाँचे तुकाराम बिरकड यांचा विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन अध्यक्ष तब्बल दोन वर्षानंतर मिळाला. त्यामुळे मंडळावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. प्रशासकीय अधिकारी गंभीर नाही. (प्रतिनिधी)