शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

विदर्भात संगणकाद्वारे शेती !

By admin | Updated: June 9, 2015 03:17 IST

पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळपिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने. संगणकीकृत नियंत्रक आणि सौरऊर्जेद्वारे त्यांनी डाळिंब शेती फुलविली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग विदर्भातील एकमेव आहे. विदर्भातील शेती म्हटली की, सर्वप्रथम कर्जाचा डोंगर आणि आत्महत्या करणारे शेतकरी असेच काहीसे चित्र डोळ्यांपुढे येते. त्यातही यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध. अशा या जिल्ह्यातील लासिना येथील हरीश बाळकृष्ण त्रिवेदी यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगणकाद्वारे नियंत्रित होणारी त्यांची शेती इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. वेळ, पाणी, खत आणि मनुष्यबळाची बचत करणारे हे तंत्रज्ञान विदर्भात अगदी नवीन आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी शेतीला संगणकीकृत करण्यास प्रारंभ झाला आणि अवघ्या ५ महिन्यांत म्हणजे १५ मेपासून त्यांच्या शेतात स्वयंचलित पद्धतीने खते आणि पाणी पिकांपर्यंत पोहोचत आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी यासाठी केला आहे. संगणकीकृत नियंत्रकात एक तासापासून ते दोन महिन्यांपर्यंत पाणी आणि खताचा प्रोग्राम फिड करता येतो. विद्राव्य पद्धतीने खत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन खतांसाठी वेगवेगळे तीन ड्रम ठेवले आहेत. हे ड्रम एका पाइपच्या माध्यमातून फर्टिगेशन पंपला जोडले आहे. फर्टिगेशन पंप सामू (पीएच) नियंत्रित करून पाणी आणि खत ड्रीपमधून झाडाजवळ जाते. यासाठी केवळ या शेतकऱ्याला एक बटन दाबावे लागते. या शेतात सौरऊर्जेवरील मोटरपंपही संगणक नियंत्रित आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार फिडिंग केलेल्या प्रोग्रामनुसार पाणी आणि खत आवश्यक असेल त्याचवेळेस मोटारपंप सुरू होतो. या स्वयंचलित खते व पाणी नियंत्रण पद्धतीने ७० टक्के खत, ७० टक्के पाणी आणि ८० टक्के मजुरीची बचत होते. सध्या त्यांच्या डाळिंबाच्या शेतीवर केवळ ६ महिला मजूर आणि ३ पुरुषांची मदत घेतली जाते. ताळमेळ आवश्यकआधुनिक शेतीसाठी मोठे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांनी जमाखर्चाचा ताळमेळ लावून शेती करावी. २४ तास परिश्रम करण्याची तयारी असेल तरच शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते. छोटे-छोटे प्रयोग करून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे हरीश त्रिवेदी सांगतात. पिकांसाठी संगीत थेरपीहरीश त्रिवेदी पिकांसाठी आता संगीत थेरपीचा वापर करणार आहेत. शेतात वॉटरप्रूफ स्पीकर लावून झाडांना संगीत ऐकविणार आहेत. प्रात:काली वाद्य संगीत, सकाळी भक्ती संगीत, सकाळी ९ ते १२ या वेळात उडत्या चालीची गाणी, दुपारी ४ ते ५ या वेळात बडबडगीते, सायंकाळी शास्त्रीय संगीत वाजविल्यास उत्पादनात ५० टक्केपर्यंत वाढ होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.