शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विदर्भात संगणकाद्वारे शेती !

By admin | Updated: June 9, 2015 03:17 IST

पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळपिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने. संगणकीकृत नियंत्रक आणि सौरऊर्जेद्वारे त्यांनी डाळिंब शेती फुलविली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग विदर्भातील एकमेव आहे. विदर्भातील शेती म्हटली की, सर्वप्रथम कर्जाचा डोंगर आणि आत्महत्या करणारे शेतकरी असेच काहीसे चित्र डोळ्यांपुढे येते. त्यातही यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध. अशा या जिल्ह्यातील लासिना येथील हरीश बाळकृष्ण त्रिवेदी यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगणकाद्वारे नियंत्रित होणारी त्यांची शेती इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. वेळ, पाणी, खत आणि मनुष्यबळाची बचत करणारे हे तंत्रज्ञान विदर्भात अगदी नवीन आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी शेतीला संगणकीकृत करण्यास प्रारंभ झाला आणि अवघ्या ५ महिन्यांत म्हणजे १५ मेपासून त्यांच्या शेतात स्वयंचलित पद्धतीने खते आणि पाणी पिकांपर्यंत पोहोचत आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी यासाठी केला आहे. संगणकीकृत नियंत्रकात एक तासापासून ते दोन महिन्यांपर्यंत पाणी आणि खताचा प्रोग्राम फिड करता येतो. विद्राव्य पद्धतीने खत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन खतांसाठी वेगवेगळे तीन ड्रम ठेवले आहेत. हे ड्रम एका पाइपच्या माध्यमातून फर्टिगेशन पंपला जोडले आहे. फर्टिगेशन पंप सामू (पीएच) नियंत्रित करून पाणी आणि खत ड्रीपमधून झाडाजवळ जाते. यासाठी केवळ या शेतकऱ्याला एक बटन दाबावे लागते. या शेतात सौरऊर्जेवरील मोटरपंपही संगणक नियंत्रित आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार फिडिंग केलेल्या प्रोग्रामनुसार पाणी आणि खत आवश्यक असेल त्याचवेळेस मोटारपंप सुरू होतो. या स्वयंचलित खते व पाणी नियंत्रण पद्धतीने ७० टक्के खत, ७० टक्के पाणी आणि ८० टक्के मजुरीची बचत होते. सध्या त्यांच्या डाळिंबाच्या शेतीवर केवळ ६ महिला मजूर आणि ३ पुरुषांची मदत घेतली जाते. ताळमेळ आवश्यकआधुनिक शेतीसाठी मोठे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांनी जमाखर्चाचा ताळमेळ लावून शेती करावी. २४ तास परिश्रम करण्याची तयारी असेल तरच शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते. छोटे-छोटे प्रयोग करून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे हरीश त्रिवेदी सांगतात. पिकांसाठी संगीत थेरपीहरीश त्रिवेदी पिकांसाठी आता संगीत थेरपीचा वापर करणार आहेत. शेतात वॉटरप्रूफ स्पीकर लावून झाडांना संगीत ऐकविणार आहेत. प्रात:काली वाद्य संगीत, सकाळी भक्ती संगीत, सकाळी ९ ते १२ या वेळात उडत्या चालीची गाणी, दुपारी ४ ते ५ या वेळात बडबडगीते, सायंकाळी शास्त्रीय संगीत वाजविल्यास उत्पादनात ५० टक्केपर्यंत वाढ होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.