शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात संगणकाद्वारे शेती !

By admin | Updated: June 9, 2015 03:17 IST

पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळपिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने. संगणकीकृत नियंत्रक आणि सौरऊर्जेद्वारे त्यांनी डाळिंब शेती फुलविली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग विदर्भातील एकमेव आहे. विदर्भातील शेती म्हटली की, सर्वप्रथम कर्जाचा डोंगर आणि आत्महत्या करणारे शेतकरी असेच काहीसे चित्र डोळ्यांपुढे येते. त्यातही यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध. अशा या जिल्ह्यातील लासिना येथील हरीश बाळकृष्ण त्रिवेदी यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगणकाद्वारे नियंत्रित होणारी त्यांची शेती इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. वेळ, पाणी, खत आणि मनुष्यबळाची बचत करणारे हे तंत्रज्ञान विदर्भात अगदी नवीन आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी शेतीला संगणकीकृत करण्यास प्रारंभ झाला आणि अवघ्या ५ महिन्यांत म्हणजे १५ मेपासून त्यांच्या शेतात स्वयंचलित पद्धतीने खते आणि पाणी पिकांपर्यंत पोहोचत आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी यासाठी केला आहे. संगणकीकृत नियंत्रकात एक तासापासून ते दोन महिन्यांपर्यंत पाणी आणि खताचा प्रोग्राम फिड करता येतो. विद्राव्य पद्धतीने खत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन खतांसाठी वेगवेगळे तीन ड्रम ठेवले आहेत. हे ड्रम एका पाइपच्या माध्यमातून फर्टिगेशन पंपला जोडले आहे. फर्टिगेशन पंप सामू (पीएच) नियंत्रित करून पाणी आणि खत ड्रीपमधून झाडाजवळ जाते. यासाठी केवळ या शेतकऱ्याला एक बटन दाबावे लागते. या शेतात सौरऊर्जेवरील मोटरपंपही संगणक नियंत्रित आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार फिडिंग केलेल्या प्रोग्रामनुसार पाणी आणि खत आवश्यक असेल त्याचवेळेस मोटारपंप सुरू होतो. या स्वयंचलित खते व पाणी नियंत्रण पद्धतीने ७० टक्के खत, ७० टक्के पाणी आणि ८० टक्के मजुरीची बचत होते. सध्या त्यांच्या डाळिंबाच्या शेतीवर केवळ ६ महिला मजूर आणि ३ पुरुषांची मदत घेतली जाते. ताळमेळ आवश्यकआधुनिक शेतीसाठी मोठे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांनी जमाखर्चाचा ताळमेळ लावून शेती करावी. २४ तास परिश्रम करण्याची तयारी असेल तरच शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते. छोटे-छोटे प्रयोग करून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे हरीश त्रिवेदी सांगतात. पिकांसाठी संगीत थेरपीहरीश त्रिवेदी पिकांसाठी आता संगीत थेरपीचा वापर करणार आहेत. शेतात वॉटरप्रूफ स्पीकर लावून झाडांना संगीत ऐकविणार आहेत. प्रात:काली वाद्य संगीत, सकाळी भक्ती संगीत, सकाळी ९ ते १२ या वेळात उडत्या चालीची गाणी, दुपारी ४ ते ५ या वेळात बडबडगीते, सायंकाळी शास्त्रीय संगीत वाजविल्यास उत्पादनात ५० टक्केपर्यंत वाढ होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.