शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

कुलगुरुपदाचा तिढा अजूनही सुटेना

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

१९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली

शिवाजी गोरे - दापोली--देशातील कृषी विद्यापीठातील नंबर वनचे दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नसल्यसाने परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू प्रभारी कुलगुरु म्हणून दापोली कृषी विद्यापीठाचा गाडा हाकत आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा घोळ कायम असल्याने तिढा सुटता सुटेना.कोकणच्या कृषी विकासाला गती देण्यासाठी दापोली येथे १९७२ साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कषी विद्यापीठ स्थापन झाले. कृषी विद्यापीठाने ५० वर्ष पूर्ण केली. या विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात देशात अनेक विक्रम केले आहेत. देशातील नामवंत कृषी विद्यापीठाला कुलगुरु मिळू नये, याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन कुलगुरु लवांडे यांचा कार्यकाळ १९ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होत होता. १९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली. आॅगस्ट महिन्यात माजी न्यायमूर्ती पटेल यांचे अध्यक्षतेखाली निवड कमिटी स्थापन करण्यात आली. दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या जाहिराती वरुन पात्र उमेदवाराने अर्ज केले. ठरल्याप्रमाणे उमेदवाराची अर्ज छाननी व मुलाखती झाल्या. कुलगुरु पदासाठी अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी अर्ज केले होते. यापूर्वीसुद्धा दोन तीन मुलाखती अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यापैकी एखाद्या पात्र उमेदवाराची निवड होणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही झाले. अंतिम मुलाखतीच्या उमेदवारांना काहीही कळवण्यात आले नसल्याचे पुढे येत आहे. ज्या दिवशी नवीन कुलगुरुने डॉ. लवांडे यांच्याकडून चार्ज घेणे गरजेचे होते. त्या दिवशी संध्याकाळी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांचे प्रभारी चार्ज सोपवण्याचे आदेश आले. कुलगुरु पदासाठी पात्र उमेदवार नव्हता, तर त्यांचे अर्ज अपात्र का ठरवण्यात आले नाहीत, त्यांचा मुलाखती का घेण्यात आल्या, शेवटच्या पाच उमेदवारांना अपेक्षा होती परंतु त्यापैकी कोणाचीही निवड न करता त्यांची चेष्टा केल्याचा प्रकार घडला. ते जर पात्र नव्हते तर मुलाखती का घेतल्या, पात्र होते तर त्यापैकी एकाची निवड का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता नसल्याने कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे.कुलगुरु पदाचे निकष बदलण्याचा विचार शासन करत आहे. कुलगुरु पदाचे निकष बदलण्यापूर्वी मग भरतीच का घेतली गेली, नॉट फाऊंड सुटेबल अशा शेरा का मारला गेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.