शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कुलगुरुपदाचा तिढा अजूनही सुटेना

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

१९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली

शिवाजी गोरे - दापोली--देशातील कृषी विद्यापीठातील नंबर वनचे दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नसल्यसाने परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू प्रभारी कुलगुरु म्हणून दापोली कृषी विद्यापीठाचा गाडा हाकत आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा घोळ कायम असल्याने तिढा सुटता सुटेना.कोकणच्या कृषी विकासाला गती देण्यासाठी दापोली येथे १९७२ साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कषी विद्यापीठ स्थापन झाले. कृषी विद्यापीठाने ५० वर्ष पूर्ण केली. या विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात देशात अनेक विक्रम केले आहेत. देशातील नामवंत कृषी विद्यापीठाला कुलगुरु मिळू नये, याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन कुलगुरु लवांडे यांचा कार्यकाळ १९ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होत होता. १९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली. आॅगस्ट महिन्यात माजी न्यायमूर्ती पटेल यांचे अध्यक्षतेखाली निवड कमिटी स्थापन करण्यात आली. दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या जाहिराती वरुन पात्र उमेदवाराने अर्ज केले. ठरल्याप्रमाणे उमेदवाराची अर्ज छाननी व मुलाखती झाल्या. कुलगुरु पदासाठी अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी अर्ज केले होते. यापूर्वीसुद्धा दोन तीन मुलाखती अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यापैकी एखाद्या पात्र उमेदवाराची निवड होणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही झाले. अंतिम मुलाखतीच्या उमेदवारांना काहीही कळवण्यात आले नसल्याचे पुढे येत आहे. ज्या दिवशी नवीन कुलगुरुने डॉ. लवांडे यांच्याकडून चार्ज घेणे गरजेचे होते. त्या दिवशी संध्याकाळी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांचे प्रभारी चार्ज सोपवण्याचे आदेश आले. कुलगुरु पदासाठी पात्र उमेदवार नव्हता, तर त्यांचे अर्ज अपात्र का ठरवण्यात आले नाहीत, त्यांचा मुलाखती का घेण्यात आल्या, शेवटच्या पाच उमेदवारांना अपेक्षा होती परंतु त्यापैकी कोणाचीही निवड न करता त्यांची चेष्टा केल्याचा प्रकार घडला. ते जर पात्र नव्हते तर मुलाखती का घेतल्या, पात्र होते तर त्यापैकी एकाची निवड का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता नसल्याने कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे.कुलगुरु पदाचे निकष बदलण्याचा विचार शासन करत आहे. कुलगुरु पदाचे निकष बदलण्यापूर्वी मग भरतीच का घेतली गेली, नॉट फाऊंड सुटेबल अशा शेरा का मारला गेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.