शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कुलगुरुपदाचा तिढा अजूनही सुटेना

By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST

१९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली

शिवाजी गोरे - दापोली--देशातील कृषी विद्यापीठातील नंबर वनचे दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळाला नसल्यसाने परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू प्रभारी कुलगुरु म्हणून दापोली कृषी विद्यापीठाचा गाडा हाकत आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा घोळ कायम असल्याने तिढा सुटता सुटेना.कोकणच्या कृषी विकासाला गती देण्यासाठी दापोली येथे १९७२ साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कषी विद्यापीठ स्थापन झाले. कृषी विद्यापीठाने ५० वर्ष पूर्ण केली. या विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात देशात अनेक विक्रम केले आहेत. देशातील नामवंत कृषी विद्यापीठाला कुलगुरु मिळू नये, याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन कुलगुरु लवांडे यांचा कार्यकाळ १९ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण होत होता. १९ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी नव्या कुलगुरुची प्रक्रिया होणे गरजेचे होते. कार्र्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी ३ महिने आधी निवड कमिटी स्थापन झाली. आॅगस्ट महिन्यात माजी न्यायमूर्ती पटेल यांचे अध्यक्षतेखाली निवड कमिटी स्थापन करण्यात आली. दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या जाहिराती वरुन पात्र उमेदवाराने अर्ज केले. ठरल्याप्रमाणे उमेदवाराची अर्ज छाननी व मुलाखती झाल्या. कुलगुरु पदासाठी अनेक तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी अर्ज केले होते. यापूर्वीसुद्धा दोन तीन मुलाखती अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यापैकी एखाद्या पात्र उमेदवाराची निवड होणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही झाले. अंतिम मुलाखतीच्या उमेदवारांना काहीही कळवण्यात आले नसल्याचे पुढे येत आहे. ज्या दिवशी नवीन कुलगुरुने डॉ. लवांडे यांच्याकडून चार्ज घेणे गरजेचे होते. त्या दिवशी संध्याकाळी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांचे प्रभारी चार्ज सोपवण्याचे आदेश आले. कुलगुरु पदासाठी पात्र उमेदवार नव्हता, तर त्यांचे अर्ज अपात्र का ठरवण्यात आले नाहीत, त्यांचा मुलाखती का घेण्यात आल्या, शेवटच्या पाच उमेदवारांना अपेक्षा होती परंतु त्यापैकी कोणाचीही निवड न करता त्यांची चेष्टा केल्याचा प्रकार घडला. ते जर पात्र नव्हते तर मुलाखती का घेतल्या, पात्र होते तर त्यापैकी एकाची निवड का झाली नाही, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. दापोली कृषी विद्यापीठाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता नसल्याने कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे.कुलगुरु पदाचे निकष बदलण्याचा विचार शासन करत आहे. कुलगुरु पदाचे निकष बदलण्यापूर्वी मग भरतीच का घेतली गेली, नॉट फाऊंड सुटेबल अशा शेरा का मारला गेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.