शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्यार्थी संघटनेच्या निशाण्यावर कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:50 IST

आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे

मुंबई : आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे, ही वेळ आल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या असून, मंगळवारी तीन संघटनांनी आंदोलन केले.लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, मंगळवारी दुपारी युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. युवासेनेने कलिना कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर, युवासेनेचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीला गेले. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिणा-या अथवा नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची, निकाल जाहीर न झाल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क करावा, अशी मागणी केली. या मागणीला कुलगुरूंनी मान्यता दिली असून, हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती सिनेटचे माजी सदस्य युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विधान भवनाबाहेर निदर्शने केली. आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडले आणि संध्याकाळीसोडून दिले. अभाविपने सोमवारी कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले होते, त्या वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना पकडले होते. घोषणाबाजी करत मंगळवारी अभाविपने आंदोलनकेले.विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये मंगळवारी दुपारी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने ( एसएफआय) आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याचा नियम विद्यापीठाने पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कडक शासन व्हावे, अशी एसएफआयचे म्हणणे आहे.आज कलिना कॅम्पस दणाणणार -कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. बुधवारी फोर्ट कॅम्पसमध्ये आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया आंदोलन करणार आहेत.विद्यार्थी संघटनांच्या प्रमुख मागण्या : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राजीनामा द्यावा,पुनर्मूल्यांकन मोफत करून द्यावे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.मंगळवार अखेर एकूण १७ लाख ७६ हजार ६९९ उत्तरपत्रिकांपैकी १४ लाख ७८ हजार ४५२ उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून अद्याप २ लाख ९८ हजार २१३ उत्तरपत्रिका शिल्लक आहेत.शिक्षणमंत्र्यांची घेतली भेटअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवन परिसरात भेट घेतली. या वेळी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदावर सनदी अधिकारी नियुक्त करण्याबाबत विचार करण्यात येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचे शुल्क माफ करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले.