शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संघटनेच्या निशाण्यावर कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:50 IST

आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे

मुंबई : आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे, ही वेळ आल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या असून, मंगळवारी तीन संघटनांनी आंदोलन केले.लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, मंगळवारी दुपारी युवासेनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. युवासेनेने कलिना कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर, युवासेनेचे शिष्टमंडळ कुलगुरूंच्या भेटीला गेले. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छिणा-या अथवा नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची, निकाल जाहीर न झाल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क करावा, अशी मागणी केली. या मागणीला कुलगुरूंनी मान्यता दिली असून, हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती सिनेटचे माजी सदस्य युवासेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी दिली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विधान भवनाबाहेर निदर्शने केली. आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडले आणि संध्याकाळीसोडून दिले. अभाविपने सोमवारी कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले होते, त्या वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना पकडले होते. घोषणाबाजी करत मंगळवारी अभाविपने आंदोलनकेले.विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये मंगळवारी दुपारी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने ( एसएफआय) आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याचा नियम विद्यापीठाने पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कडक शासन व्हावे, अशी एसएफआयचे म्हणणे आहे.आज कलिना कॅम्पस दणाणणार -कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. बुधवारी फोर्ट कॅम्पसमध्ये आदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया आंदोलन करणार आहेत.विद्यार्थी संघटनांच्या प्रमुख मागण्या : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राजीनामा द्यावा,पुनर्मूल्यांकन मोफत करून द्यावे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.मंगळवार अखेर एकूण १७ लाख ७६ हजार ६९९ उत्तरपत्रिकांपैकी १४ लाख ७८ हजार ४५२ उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून अद्याप २ लाख ९८ हजार २१३ उत्तरपत्रिका शिल्लक आहेत.शिक्षणमंत्र्यांची घेतली भेटअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवन परिसरात भेट घेतली. या वेळी विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदावर सनदी अधिकारी नियुक्त करण्याबाबत विचार करण्यात येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचे शुल्क माफ करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला दिले.