शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ठाणे, पुणे क्षेत्रात वाहनांची ‘भाऊगर्दी’

By admin | Updated: October 13, 2016 06:40 IST

दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भेडसावणारी पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यात सरकार व प्रशासन अपयशी ठरत असताना राज्यात ठाणे, वसई, कल्याण, वाशी या क्षेत्रात तब्बल ३२ लाख ५० हजार १८८ वाहने रस्त्यावर धावत असल्याची आकडेवारी समोर आली असून राज्यात सर्वाधिक वाहन संख्या असलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. पहिला क्रमांक पुणे क्षेत्राचा असून तेथे ५८ लाख वाहने रस्त्यावर आहेत. मुंबईचा क्रमांक तिसरा आहे.पुणे क्षेत्रात (पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथे ५८ लाख वाहने धावत आहेत. यानंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो. मुंबईत आता २८ लाख वाहने धावत असल्याची नोंद आरटीओकडे आहे. वाहन नोंदणी आणि लायसन्सच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होताना दिसते. राज्यात २०१५-१६ मध्ये २३ लाख ११ हजार ४५१ नवीन वाहनांची नोंद झाली. त्यानंतर २०१६ मध्ये एप्रिल ते मेपर्यंत आणखी तीन लाख ९५ हजार वाहनांची भर पडली. गेल्या दोन ते अडीच वर्षांत साधारपणे वाहन नोंदणीत नऊ ते साडेनऊ टक्के वाढ होत आहे. हीच स्थिती लायसन्सचीही असून दोन वर्षांत जवळपास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ होत आहे. राज्यात एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३५ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये असून मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या वाहन संख्येमुळे ही कार्यालयेही अपुरी पडत आहेत. त्यामुळे आणखी काही कार्यालये स्थापन करण्याचा परिवहन आयुक्त कार्यालयाचा विचार आहे.