शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरीची तक्रार होणार आॅनलाइन !

By admin | Updated: May 29, 2016 00:37 IST

राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई

राज्यभरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्ययावत पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता घटनास्थळावरूनच वाहनचोरीची तक्रार घेवून काही मिनिटांत पोलिसांकडून वाहनाचा शोध घेण्याला सुरवात होणार आहे. याकरिता विविध सुविधा उपलब्ध असलेले मोबाइल अ‍ॅप्लीकेशन बनवण्याची प्रक्रिया राज्य पोलिसांकडून सुरू असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असणाऱ्या टोळ्या राज्यभरातून वाहनचोरी करत आहेत. दुचाकीसह ट्रक, टेंपो व कंटेनर चोरी करुन ते राज्यातच किंवा इतर राज्यात विकले जात आहेत. त्यानुसार राज्यभरात चोरी होणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून अवघ्या नवी मुंबई आयुक्तालयातूनच प्रतिवर्षी सुमारे ५०० ते ६०० वाहने चोरीला जात आहेत, तर मागील सहा वर्षांत सुमारे साडेपाच हजार छोटी-मोठी वाहने नवी मुंबईतून चोरीला गेलेली आहेत. त्यापैकी सुमारे बाराशे वाहनांचा तपास पोलिसांना लागू शकलेला आहे.वाहनचोरीला आळा घालण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अनेक टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु शहरातल्या किंवा शहराबाहेरील सराईत टोळ्यांबरोबरच अंतरराष्ट्रीय वाहनचोर टोळ्यांचे देखील मोठे आव्हान राज्य पोलिसांपुढे आहे.एका राज्यातली चोरीची वाहने दुसऱ्या राज्यात विकणे, तसेच चोरीच्या वाहनांचे सुटे भाग करुन ते विकणाऱ्या अनेक टोळ्या राज्यात सक्रिय आहेत. या टोळ्या राज्यातून वर्षाला हजारो छोटी-मोठी वाहने चोरत आहेत. अशाच एका टोळीला एपीएमसी पोलिसांनी धुळे येथून अटक देखील केलेली आहे. राज्यभरातील चोरीच्या ट्रकची विल्हेवाट लावून त्याचे उपयोगी भाग मुंबई व नवी मुंबई परिसरात ते विकत होते. अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळून वाहनचोरीच्या घटनांची उकल करण्यासाठी राज्य पोलिसांकडून मोबाइल अ‍ॅप्लीकेशन तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेकदा एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या चोरीच्या वाहनाची माहिती दुसऱ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना नसते. परिणामी चोरीचे वाहन बेवारस म्हणून पडलेले असतानाही त्याचा छडा लागत नाही. मात्र या अ‍ॅप्लीकेशनमुळे यापुढे बेवारस वाहनांचाही उलगडा पोलीस करू शकणार आहेत. ही प्रक्रिया अधिक सक्षमतेने राबविण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले आहे.