शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

मुंबईत सांडपाण्यावर भाजीपाला

By admin | Updated: March 16, 2017 00:23 IST

रेल्वे ट्रॅकच्या कडेला पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकविण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, हा भाजीपाला खाण्यायोग्य असतो का, त्याने काही अपाय होतो का

मुंबई : रेल्वे ट्रॅकच्या कडेला पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकविण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, हा भाजीपाला खाण्यायोग्य असतो का, त्याने काही अपाय होतो का, असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. हाच प्रश्न विधान परिषदेतील काही सदस्यांना पडला आहे. भाजी लागवडीसाठी सांडपाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कुबली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला लेखी उत्तरही दिली आहे. रेल्वे मार्गालगत भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी सांडपाण्याचा वापर केला जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, किरण पावसकर, नरेंद्र पाटील, विद्या चव्हाण आदी सदस्यांनी विचारला होता. या भाज्या आरोग्यास अपायकारक व घातक असून त्यामुळे पोटाचे विकार तसेच कॅन्सर, डायबेटीज आदी गंभीर आजार होत असल्याचा दावा या प्रश्नात करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तरात रेल्वे ट्रॅकलगतच्या भाजी लागवडीसाठी सांडपाणी वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कबुलीच दिली. मात्र यापुढे भाजीपाला लागवडीसाठी स्वच्छ पाणीच वापरले जाईल याची खबरदारी घेऊनच लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशा सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मार्गात लगत असणा-या रेल्वेच्या अखत्यारीतील भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वेने आपल्या इच्छुक कर्मचा-यांना काही शुल्क आकारून भाजीपाल्याची लागवडीस परवानगी दिली आहे. अनेक वर्षांपासून अशी लागवड सुरु आहे. या जागेवर भाजीपाला पिकविताना शेजारुन वाहणा-या नाल्याचे पाणी वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या पालेभाज्यांमुळे कँसर, मधुमेह किंवा अन्य गंभीर रोग होत असल्याचा कोणताच ठोस आणि शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. अथवा तशा तक्रारही पालिकेकडे आलेली नाही, असे या लेखी उत्तरात म्हटले आहे.