शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो

By admin | Updated: August 31, 2016 07:31 IST

शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत.

नामदेव मोरे , नवी मुंबईशेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत. दोन महिन्यांत टोमॅटोचे दर १० पट तर भेंडीचे दर ८ पट कमी झाले आहेत. भाजीपाला विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत असतो. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी मार्चपासून कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतात. परंतु या वर्षी अचानक आॅगस्टमध्ये भाव कोसळले आहेत. राज्यातील बहुतांश सर्व होलसेल मार्केटमध्ये कांदा २ ते ८ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी १ रुपया किलो दरानेही कांदा विकला जात आहे. कांद्यापाठोपाठ इतर भाज्यांचे भावही शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी काढू लागले आहेत. जूनमध्ये मुंबई एपीएमसीमध्ये भेंडी ४० ते ४४ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्य:स्थितीत हे दर ५ ते १२ रुपये झाले आहेत. १६ ते २० रुपयांचा कोबी ४ ते ६ रुपयांना विकला जात असून, टोमॅटो ४० रुपयांवरून ४ रुपये किलो झाले आहेत. राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये अशीच स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये कोबी ३ ते ६ व टोमॅटो २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. दोन महिन्यांत ८ ते १० पट भाव घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईमध्ये विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना विक्रीतून उत्पादनासाठी लागलेला खर्चही मिळेनासा झालेला आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात पाव किलो भाजी घेण्यासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना एक किलो भाजीसाठीही तेवढे पैसे मिळत नाहीत. १५ रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत नाही.