शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
6
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
7
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
8
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
9
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
10
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
13
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
14
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
15
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
16
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
17
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
18
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
19
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
20
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी वीज प्रकल्पास व्हॅट, ‘सीएसटी’मधून सूट

By admin | Updated: July 4, 2017 05:32 IST

रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा.लि. वीज निर्मिती प्रकल्पास व्हॅट, सीएसटी तसेच विजेच्या वहनावरील पारेषण शुल्क व हानी यामधून १ एप्रिल २०१७ पासून

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा.लि. वीज निर्मिती प्रकल्पास व्हॅट, सीएसटी तसेच विजेच्या वहनावरील पारेषण शुल्क व हानी यामधून १ एप्रिल २०१७ पासून पुढील पाच वर्षांसाठी पूर्णत: सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनास मदत होणार आहे.नैसर्गिक वायूवर आधारित १ हजार ९६७ मेगावॅट क्षमतेचा हा वीज निर्मिती प्रकल्प २०१४ पासून बंद होता. सुमारे ८ हजार ९०० कोटी रुपयांच्या थकीत कजार्मुळे हा प्रकल्प अनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित होण्याच्या मार्गावर होता. एप्रिल २०१७ पासून पुढील ५ वर्षांसाठी राज्य शासनाकडून व्हॅट, सीएसटी तसेच वहन शुल्क माफ करण्याची मागणी या प्रकल्पाकडून करण्यात आली होती. या प्रकल्पास पुरवठा करण्यात येणाऱ्या वायूवर व्हॅट, सीएसटी तसेच निर्माण होणाऱ्या विजेच्या वहनावरील शुल्क व गळती यामधून १ एप्रिल २०१७ पासून पुढील ५ वर्षांसाठी पूर्णत: सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘त्या’ न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीराज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना न्या. शेट्टी आयोगाच्या शिफारशींनुसार तीन आगाऊ वेतनवाढी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.न्यायिक अधिकाऱ््यांनी सेवेत येण्यापूर्वी किंवा त्यानंतर कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल तर त्यांना एकदाच तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ दिला जाईल.तीन आगाऊ वेतनवाढी, पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजना यांचा लाभ दिल्यानंतर तसेच पदोन्नतीच्या पदाची किंवा आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वेतननिश्चिती केल्यावर त्यांना पुन्हा तीन आगाऊ वेतनवाढ देता येणार नाहीत. ग्रामरक्षक दल स्थापण्यातील दिरंगाईला लगाम ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी ग्रामसभेची बैठक त्या क्षेत्राचे तहसीलदार किंवा तहसीलदारांनी नेमलेला अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करता येईल. ही दले स्थापन करण्यासाठी कालापव्यय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी तहसीलदारांच्या उपस्थितीतच अशी बैठक घ्यावी लागत होती.एकात्मिक बालविकास योजना १५ जिल्ह्यांतहीकेंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्रचना योजना राज्यातील उर्वरित १५ जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेचा आर्थिक भार केंद्र ६० टक्के तर राज्य शासन ४० टक्के असा उचलेल. राज्याचा वाटा देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या आधी राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू आहे.