शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

कोकणात खोळंबली भातलावणीची कामे

By admin | Updated: July 12, 2017 04:28 IST

सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के इतक्याच लावण्या पूर्ण झाल्या आहेत. रविवारपासून पावसाने पुनरागमन केल्यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.जूनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्या काळात नांगरणी आणि पेरणीची कामे पारंपरिक वेळापत्रकानुसार झाली. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला चांगलीच खीळ बसली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन प्रकारची शेती आहे. डोंगर उतारावरची शेती, पायथ्याची शेती आणि सखल भागातील शेती. सद्य:स्थितीत सखल भागातील शेतीला पाण्याची कमतरता नाही. झालेल्या पावसाच्या आधारावर सखल भागातील लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, डोंगर उतारावरच्या आणि पायथ्याच्या शेतीला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ७१ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती केली जाते. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. नागली, वरी आणि भाजीपाल्याची लागवड तुलनेने खूपच कमी आहे. मात्र, त्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने नांगरणी आणि पेरणीची कामे वेळेत झाली. त्यामुळे रोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र, चिखलणीसाठी पाऊसच नसल्याने तयार झालेली रोपे सुकून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. >पंप लावून लावण्याज्या भागात शेताच्या जवळपास नदी किंवा मोठे ओढे आहेत, अशा भागात पंपाने पाणी खेचून शेती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पंप भाड्याने आणावे लागत असल्याने ते खर्चिक होत आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत.जिल्हाएकूण क्षेत्रलावणी झालेलेटक्केहेक्टरमध्येक्षेत्र (हे.)रत्नागिरी७१,०००३९,०५०५५सिंधुदुर्ग५०,२३०२०,७२७४१