शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोकणात खोळंबली भातलावणीची कामे

By admin | Updated: July 12, 2017 04:28 IST

सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के इतक्याच लावण्या पूर्ण झाल्या आहेत. रविवारपासून पावसाने पुनरागमन केल्यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला अधिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.जूनमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्या काळात नांगरणी आणि पेरणीची कामे पारंपरिक वेळापत्रकानुसार झाली. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला चांगलीच खीळ बसली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन प्रकारची शेती आहे. डोंगर उतारावरची शेती, पायथ्याची शेती आणि सखल भागातील शेती. सद्य:स्थितीत सखल भागातील शेतीला पाण्याची कमतरता नाही. झालेल्या पावसाच्या आधारावर सखल भागातील लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, डोंगर उतारावरच्या आणि पायथ्याच्या शेतीला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ७१ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती केली जाते. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. नागली, वरी आणि भाजीपाल्याची लागवड तुलनेने खूपच कमी आहे. मात्र, त्यालाही पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने नांगरणी आणि पेरणीची कामे वेळेत झाली. त्यामुळे रोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र, चिखलणीसाठी पाऊसच नसल्याने तयार झालेली रोपे सुकून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. >पंप लावून लावण्याज्या भागात शेताच्या जवळपास नदी किंवा मोठे ओढे आहेत, अशा भागात पंपाने पाणी खेचून शेती केली जात आहे. मात्र, त्यासाठी पंप भाड्याने आणावे लागत असल्याने ते खर्चिक होत आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहात आहेत.जिल्हाएकूण क्षेत्रलावणी झालेलेटक्केहेक्टरमध्येक्षेत्र (हे.)रत्नागिरी७१,०००३९,०५०५५सिंधुदुर्ग५०,२३०२०,७२७४१