शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उर्दू शाळेतील वीज खंडित

By admin | Updated: September 10, 2016 03:00 IST

उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे वीज बिल गेल्या चार वर्षात न भरल्याने थकबाकी ८० हजार रुपयांनी अधिक झाली होती.

शशी करपे,

वसई- नालासोपारा गावातील जिल्हा परिषदेच उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेचे वीज बिल गेल्या चार वर्षात न भरल्याने थकबाकी ८० हजार रुपयांनी अधिक झाली होती. याप्रकरणी वारंवार नोटीसा बजावूनही बील न भरल्याने महावितरणने शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना आता विजे आभावी अंधारातच बसावे लागत आहे.वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या एकापाठोपाठ एक शाळा बंद पडू लागल आहेत. अनेक शाळांना मुख्याध्यापक नाहीत तसेच शिक्षकांचीही कमतरता आहे. मात्र, शिक्षण खात्याच बेजबाबदारपणामुळे तक्रारी करूनही काहीच हालचाली होत नसल्याने उर्दू शाळांची अवस्था दिवसागणिक दयनिय होऊ लागली आहे. त्यातच सोपारा गावात गेल्या तीस वर्षांहून जुनी असलेल्या जिल्हा परिषदेच उर्दू माध्यमाच प्राथमिक शाळेचा वीज पुरवठा बील न भरल्याने महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी खंडीत केला आहे.शाळेला वीज पुरवठा करणाऱ्या मीटरचे बील गेल्या चार वर्षात भरलेले नाही. आता बिलाची थकबाकी ८० हजार रुपयांहून अधिक झालेली आहे. महावितरणने बिलाची थकबाकी भरावी यासाठी अनेक नोटीसा बजावल आहेत. पण, कुणीच प्रतिसाद देत नसल्याने अखेर महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी शाळेचा वीज पुरवठा खंडीत केला. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. ढग दाटून आले की, गडद अंधार पसरत असतो. त्यामुळे अंधारात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, या परिसरात अगदी गरीब घरातील लोकांची मोठी वस्ती आहे. त्यांना खाजगी शाळेत महागडी फी देऊन विशेषत: मुलींना शिकवणे परवडेनाजोगे नाही. या शाळेमुळे मुस्लीम समाजातील गरीब घरातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहत असताना उदासिन प्रशासनामुळे त्यांच्या शिक्षणाचा मुलभूत हक्कावरच गदा येऊ घातली आहे. या सगळ्या प्रकरणाकडे शिक्षणविभाग देखिल गंभिरतेने पाहत नसल्याची स्थिती आहे.साडेसातशे विद्यार्थी घेतात शिक्षणसोपारा गावात सख्खर मोहल्लामध्ये मस्जिदने दिलेल्या जागेत तीस वर्षांहून जुनी जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा आहे.सध्या या शाळेत पहिली ते पाचवीर्पंतचे वर्ग भरत असून साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी याठिकाणी शिकत आहेत. तसेच शिशूवर्गही याठिकाणी भरत असतात.शाळेत मुलींची संख्या मोठी आहे. याठिकाणी शिक्षकांचीही कमतरता आहे. असे असतानाही याठिकाणी मोठ्या सेख्येने गरीब वर्गातील मुले शिक्षण घेत आहेत.मात्र, शिक्षण खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याने शाळा अनेक गैरसोयींचा सामना करीत तग धरून आहे.>रकमेची तरतूद नसल्याने टाळाटाळयाप्रकरणी पंचायत समिती आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण, इतक्या मोठ्या रकमेची तरतूद नसल्याचे कारण सांगून अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. विद्यार्थ्यांचे पालक गरीब वर्गातील आहेत. वीज पुरवठा सुरु झाला नाही तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती आहे. काही सेवाभावींची मदत घेऊन बिल भरण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण, यावर कायमस्वरुपी तोडगा निघायला हवा असे माजी उपमहापौर सगीर डांगे यांनी लोकमतला सांगितले.