शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

युपीएससीत नागपूर शायनिंग

By admin | Updated: June 13, 2014 01:46 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुरुवारी जाहीर केलेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात नागपुरातील तरुणांनी चांगलीच भरारी घेतली. नागपुरातील आवेश तितरमारे, मृण्मय रामटेके, अर्पित गुडधे व अंकुर मेश्राम यांनी

मराठी टक्का वाढला : तितरमारे, रामटेके, गुडधे, मेश्राम चमकले नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुरुवारी जाहीर केलेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात नागपुरातील तरुणांनी चांगलीच भरारी घेतली. नागपुरातील आवेश तितरमारे, मृण्मय रामटेके, अर्पित गुडधे व अंकुर मेश्राम यांनी या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. यापैकी आवेशने देशभरातून ४६९, मृण्मयने ८११,अर्पिलने ९२२ व अंकुरने १०८४ वे स्थान पटकाविले आहे. गत काही वर्षांत युपीएससीतील नागपूरचा टक्का वाढला आहे. यात यंदाच्या निकालाने पुन्हा भर घातली आहे. देशभरातून ४६९ व्या स्थानावर आलेल्या आवेशने मॉरिस कॉलेजच्या प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्रात युपीएससीची तयारी करून यश प्राप्त केले आहे. त्यामुळे निकाल जाहीर होताच सायंकाळी या केंद्रावर आवेशच्या मित्रांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. या केंद्रातील एकूण सात विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यापैकी अंतिम यादीत स्थान मिळविण्यात केवळ आवेशला यश मिळाले आहे. सध्या येथे सुमारे ७० विद्यार्थी युपीएससीची तयारी करीत आहेत. विदर्भाचा युपीएससी परीक्षेत सहभाग वाढावा, या हेतूने सरकारच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जात आहे. अलीकडेच या केंद्रासाठी सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारत व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय येथे व्हर्च्युअल लर्निंग सेंटर व वाचनालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती यावेळी या केंद्राचे प्रभारी संचालक एम. वाय. साळुंखे यांनी दिली. ते म्हणाले, शासनाकडून विद्यार्थ्यांना पुरेपूर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील बॅचपासून येथील विद्यार्थी क्षमता ७० वरून ८० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयएएस व्हायचेच...बीडीएस करून वैद्यकीय पदवी संपादन केली. परंतु मनात लहानपणापासून आयएएस बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे बीडीएस होताच, २०११ पासून युपीएससीची तयारी सुरू केली, अन् दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळाले. पण मी इथेच थांबणार नाही. आयएएस बनणे स्वप्न आहे. त्यामुळे ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास यावेळी आवेश तितरमारे याने व्यक्त केला. युपीएससीच्या तयारी विषयी बोलताना, तो म्हणाला, रोज ८ ते ९ तास नियमित अभ्यास केल्यास कोणत्याही कोचिंग गरज नाही. मात्र हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड असणे आवश्यक आहे. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. वडील सरकारी नोकरीत आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनावरच आमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. म्हणजेच त्याला समाजाचा हातभार लागला आहे. अशा समाजाचे काही तरी देणं आहे, त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. आवेशचे वडील अनंत तितरमारे डिफेन्समध्ये नोकरीला आहे. त्यामुळे आवेशचे बहुतांश शालेय शिक्षण दिल्ली येथे झाले. परंतु बीडीएस मात्र त्याने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याच्या मोठ्या भावाने गत २००६ मध्ये आयएएस उत्तीर्ण करून, सध्या बिहारमध्ये कार्यरत आहे.