शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

अवकाळी संकटाने घेतले पाच जीव; मराठवाड्याला पावसाने झोडपले, वीज पडून ३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:47 IST

शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली

लातूर/नांदेड : मराठवाड्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले. विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जण वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत.  

अजनसोंडा खु. (ता. चाकूर, जि. लातूर) येथील मंगलबाई अशोकराव पाटील (६५), नळेगाव येथील सार्थक संतोष ढोले (२०) हे शेतात असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी १६ जनावरेही दगावली आहेत. तळेगाव (निमजी, ता.नांदेड) येथे वीज पडून संजय त्र्यंबक जोगदंड (३५) यांचा मृत्यू झाला.

चिमुकली अन् कामगार दगावलाछत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील सोलर वॉटर हिटरचे पॅनल पडल्याने गरम पाण्यामुळे होरपळून आदिती दीपक झा या चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत इमारतीच्या आडोशाला थांबलेले शैलेंद्र तिडके (४८) यांचा डोक्यात पत्र्याच्या शेडवरील दगड पडून मृत्यू झाला.

१०० पेक्षा अधिक कारखान्यांना फटकावाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे साधारण २४ तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे १०० पेक्षा अधिक कारखान्यांचे मोठे आर्थिक  नुकसान झाल्याचा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस