शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

सरकारच्या कारभारावर सारेच असमाधानी!

By admin | Updated: December 25, 2015 03:11 IST

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत अजित पवार यांचा आरोप.

अकोला : सत्तेत येण्यापूर्वी युतीच्या नेत्यांनी लोकांना मोठ-मोठी आश्‍वासने दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला. या सरकारच्या कामाने शेतकरी, व्यापारी, जनता यापैकी कुणीही समाधानी नाही. युतीच्या सरकारने राज्यातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्या प्रचारार्थ तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक अकोला येथे गुरुवारी सकाळी रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी निधीचा गैरवापर करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन आघाडीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना केले. त्यांनी वेळी युती सरकारच्या अपयशाचा खरपूस समाचार घेतला. रवींद्र सपकाळ यांच्याबाबत स्थानिक नसून, ते सर्वांना अपरिचित असल्याचा अपप्रचार केला जात आहे. हा आरोप खोडून काढताना पवार म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक लढविणारा उमेदवार हा अपरिचितच असतो. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, डॉ. राजेंद्र शिंगणे, राधेश्याम चांडक, भारत बोंद्रे, कृष्णराव इंगळे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, डॉ. संतोष कोरपे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, श्रीकांत पिसे पाटील, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक, चंद्रकांत ठाकरे, मदन भरगड, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, रवींद्र सपकाळ, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे आदींसह तिन्ही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. विजय देशमुख यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले.