शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या उमेदवारामुळे आघाडीमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 2, 2016 02:29 IST

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही

यदु जोशी,  मुंबईविधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच आमदार आरामात निवडून येत असताना भाजपाने पाचऐवजी सहा उमेदवार उभे केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांवर तर त्यांचा डोळा नाही ना, या चर्चेला उधाण आले आहे. आधी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या मूडमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचा सहावा अधिकृत उमेदवार देत काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन प्रमुख विरोधी पक्षांना गोंधळात टाकले आहे. मतदान गुप्त असल्याने काही धोका तर होणार नाही ना या शंकेने आता मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राष्ट्रवादीमध्ये रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिल्याने आतल्या आत नाराज असलेल्यांना चाचपण्याचे काम भाजपाने सुरू केले आहे. छोटे साहेब, मोठे साहेब यांच्या समर्थकांमधील हे अंतर्गत राजकारणाचे पदर उलगडून पाहिले जात आहेत. मुंबईतील एक वजनदार मंत्री आणि पुण्यातील एका नेत्याला भाजपाने चाचपणीसाठी कामाला लावले आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणे उद्या विधिमंडळात आले तर ते वरचढ होतील या भीतीने त्यांचा प्रवेश रोखण्याची सुप्त इच्छा असलेल्या काँग्रेसमधील काही आमदारांना भाजपाकडून गोंजारले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाचपणी करून काँग्रेस-राष्ट्रवादीची काही मते गळाला लागतात का याचा प्रयत्न केला जाणार आहे. तो सफल होत असल्याचे दिसले आणि अपक्ष व लहान पक्षांची मते मिळणार असे दिसले तर भाजपा आपले सहाही उमेदवार कायम ठेवेल. अन्यथा, एकाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल. भाजपाचा सहावा उमेदवार कायम राहिला तर राष्ट्रवादी वा काँग्रेसची पंचाईत होऊ शकते. विधान परिषदेचे उपसभापतीपद भाजपाला देणार असाल तर आमचा सहावा उमेदवार मागे घेऊ, असे दबावतंत्रही भाजपाकडून वापरले जाऊ शकते.मनसेतून भाजपात आलेले आणि मुंबई जिल्हा बँकेतील घोटाळ्याचे आरोप असलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या कृपेखाली अनेक वर्षे राहिलेले वादग्रस्त आर.एन. सिंह आणि राष्ट्रवादीतून अलीकडेच भाजपात उडी घेतलेले प्रसाद लाड या तिघांना भाजपाने उमेदवारी दिल्याची तीव्र प्रतिक्रिया आजदेखील पक्षात उमटली.सोशल मीडियावर टीकेचा पूर आला होता. सूत्रांनी सांगितले की, या तिघांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे आणि तिघांच्या कर्तृत्वाचे ‘वर्णन’ करणाऱ्या एसएमएसचा मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मोबाइलवर अक्षरश: पाऊस पडल्याची माहिती आहे.