शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उजनी काठालाही दुष्काळी झळा

By admin | Updated: May 29, 2016 16:56 IST

दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमतकरमाळा, दि. २९  : दुष्काळाचा फटका उजनी काठालाही बसला असून, धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने याचा फटका धरण काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ते पाणी घेण्यासाठी चर खोदून, पाईप केबल वाढवून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढे करूनही पाणी मिळत नसल्याने ते हताश बनले असून, चक्क उजनी काठावरील शेती उजाड बनली आहे.मागील दशकात २००२ नंतर २०१२ ते २०१४ अशी सलग तीन वर्षे व यंदा धरणातील पाणीपातळी सर्वाधिक खालावली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुध्दा उजनी काठावरील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत़ धरणातील पाणी दररोज कमी होत चालल्याने लाखो रूपये खर्चून लांब चर खोदून चारीतील पाणी विद्युतपंपाच्या सहाय्याने खेचून उभ्या पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील कंदर, वांगी, भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण, केत्तूर, पारेवाडी, सोगाव, पांगरे, सांगवी, वाशिंबे, उम्रड, के डगाव, शेटफळ, टाकळी, कोंढारचिंचोली, रामवाडी, उंदरगाव, मांजरगाव या धरण काठावरील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नदीपात्रात कालव्यासारखी चर खोदून तेथून विद्युतपंपाव्दारे पाणी उपसा सुरू केला आहे. विद्युतपंप व पाईपलाईनचे जाळे सर्वत्र दिसून येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची खालावल्याने पाणीपुरवठा योजनावर परिणाम झाला आहे. सोलापूर, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळासह ७१ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील ४१६ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. यामुळे हाल होत आहेत.पाण्याच्या नियोजनाची गरजउजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी त्याग केला. पण धरणातील पाणी शेतीला तर सोडाच पिण्यासाठीसुध्दा मिळत नाही. उजनी धरणातील पाणी वाटपाचे नियोजन करणे गरजेचे असून, करमाळा तालुक्यासाठी धरणातील हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असे उजनी धरण पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी सांगितले.