शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

By admin | Updated: October 3, 2016 22:43 IST

'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं

ऑनलाइन लोकमत
 
अहमदनगर, दि. 3-  'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. ते स्वतःला शेष नाग म्हणतात, सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून बिळात का गेला हा शेषनाग असा प्रश्न पडतोय, पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.’ या शब्दात  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
 'माझ्या नावातही कृष्ण आहे. ते सत्तेत आल्यावर बिळात गेलेला बांडगूळ झालेत . त्यांनी मला ओसाड गावचा पाटील म्हटलं पण त्यांनी स्वतःचा गाव तरी सांगावं.  असा हल्लाबोल  विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंवर केला.
 
'मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले. अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत अर्थिक मदत करावी. त्याचबरोबर कर्जमाफी करावी. मागण्यांसाठी प्रत्येकाला  मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी अरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत अरक्षण मागत आहे, सरकारने याबाबत भुमिका स्पष्ट करावी.  मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा करु नये, त्वरीत कायद्यात अवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं', असंही पाटील म्हणाले.