शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

उद्धव ठाकरे म्हणजे कालिया नाग आहे : विखे-पाटील

By admin | Updated: October 3, 2016 22:43 IST

'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं

ऑनलाइन लोकमत
 
अहमदनगर, दि. 3-  'शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती, मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. त्यांनी मला गांडूळ म्हटलं पण गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. ते स्वतःला शेष नाग म्हणतात, सत्तेत आल्यापासून लाचारी पत्करून बिळात का गेला हा शेषनाग असा प्रश्न पडतोय, पण स्वत:ला शेषनाग म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे तर कालिया नाग आहेत.’ या शब्दात  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
 'माझ्या नावातही कृष्ण आहे. ते सत्तेत आल्यावर बिळात गेलेला बांडगूळ झालेत . त्यांनी मला ओसाड गावचा पाटील म्हटलं पण त्यांनी स्वतःचा गाव तरी सांगावं.  असा हल्लाबोल  विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे बोलताना उद्धव ठाकरेंवर केला.
 
'मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले. अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरु करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरीत अर्थिक मदत करावी. त्याचबरोबर कर्जमाफी करावी. मागण्यांसाठी प्रत्येकाला  मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मराठा समाज कोणाच्या ओबीसी अरक्षणावर अतिक्रमण करणार नाही. घटनेच्या चौकटीत अरक्षण मागत आहे, सरकारने याबाबत भुमिका स्पष्ट करावी.  मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा करु नये, त्वरीत कायद्यात अवश्यक ती दुरुस्ती करुन आरक्षण द्यावं', असंही पाटील म्हणाले.