शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंकडून मोदींना चिमटा तर राहुल गांधींचे कौतुक

By admin | Updated: July 20, 2015 09:20 IST

पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २० - पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी थेट राहुल गांधींचे कौतुक केले आहे. 
सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भारत - पाक संबंध व राहुल गांधी या विषयावर त्यांची भूमिका मांडली आहे. ईदनिमित्त भारतीय जवानांनी दिलेली मिठाई पाकिस्तानच्या जवानांनी परतावून लावली. मात्र पाकचे जवान हे विषच ओकणारे असून पाकचा जन्मच भारताद्वेषातून झाला आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांनी कितीही प्रेमबैठका घेतल्या तरी हे प्रेम खाली झिरपत नाही असे त्यांनी म्हटले आहे.  हिरव्या सर्पांना दुध पाजून 'गोडवा' निर्माण करण्याचा फार्स वारंवार का केला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
एकीकडे मोदींना चिमटा काढतानाच उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे कौतुक केले. राहुल गांधी सध्या कोणते च्यवनप्राश खातात हे माहित नाही, पण त्यांच्यात सभाधारिष्ट्य व चेह-यावर तेज दिसत आहे, त्यांचा जोश व उत्साह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींची स्तुती केली. राहुल गांधींची भाषणं चांगली असली तरी मामला अद्याप कोरडाच आहे, पण त्यांची शाळा चांगली चालू आहे.  राहुल गांधींना फुटलेला कंठ हा विरोधाचा सूर आहे, तो शंखध्वनी होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.