शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

उद्धव ठाकरेंकडून मोदींना चिमटा तर राहुल गांधींचे कौतुक

By admin | Updated: July 20, 2015 09:20 IST

पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २० - पाकिस्तानचे भारतासोबतचे वैर संपवण्याचे मन नाही, पण आपलेच मन मैत्रीच्या गुंत्यात अडकून पडले आहे असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी थेट राहुल गांधींचे कौतुक केले आहे. 
सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भारत - पाक संबंध व राहुल गांधी या विषयावर त्यांची भूमिका मांडली आहे. ईदनिमित्त भारतीय जवानांनी दिलेली मिठाई पाकिस्तानच्या जवानांनी परतावून लावली. मात्र पाकचे जवान हे विषच ओकणारे असून पाकचा जन्मच भारताद्वेषातून झाला आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांनी कितीही प्रेमबैठका घेतल्या तरी हे प्रेम खाली झिरपत नाही असे त्यांनी म्हटले आहे.  हिरव्या सर्पांना दुध पाजून 'गोडवा' निर्माण करण्याचा फार्स वारंवार का केला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 
एकीकडे मोदींना चिमटा काढतानाच उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे कौतुक केले. राहुल गांधी सध्या कोणते च्यवनप्राश खातात हे माहित नाही, पण त्यांच्यात सभाधारिष्ट्य व चेह-यावर तेज दिसत आहे, त्यांचा जोश व उत्साह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींची स्तुती केली. राहुल गांधींची भाषणं चांगली असली तरी मामला अद्याप कोरडाच आहे, पण त्यांची शाळा चांगली चालू आहे.  राहुल गांधींना फुटलेला कंठ हा विरोधाचा सूर आहे, तो शंखध्वनी होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घ्यायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.