शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक

By admin | Updated: May 1, 2016 01:32 IST

उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली

मुंबई : उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला उत्तम मार्गदर्शन करतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गोरेगाव पूर्व व पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्या वेळेस ते बोलत होते.या उड्डाणपुलाच्या नावासह विविध विषयांवर राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या सेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला होता. त्याचप्रमाणे दुष्काळ, कन्हैयाकुमार आणि स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवरून भाजपावर कडाडून टीका करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या समारंभात काय बोलतात, आणि फडणवीस त्याला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र दोघांनी युतीतील वादाबाबत बोलण्याचे टाळले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मृणालतार्इंचे आणि युती सरकारचे विचार जरी एकमेकांना पटत नसले तरी त्यांची त्यांच्या कामावरील निष्ठा, न्यायवृत्ती याला आमचा सलाम आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पुलाला मृणालतार्इंचे नाव शिवसेनेने सुचविले म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून त्या समाजकारणात कार्यरत होत्या. पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर ‘पाणीवाली बाई’ ही उपाधी त्यांना जनतेतून मिळाली होती, तसेच लोक मानत नाहीत म्हणून पक्षबदल करून त्यांनी कधीच पक्ष व विचारांशी गद्दारी केली नाही. त्यामुळे गोरेगावच्या या पुलाला मृणालतार्इंचे नाव देणे योग्यच होते. या वेळी मृणालतार्इंच्या कन्या अंजली वर्तक, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला खा. गोपाळ शेट्टी, गजानन कीर्तिकर, सुनील प्रभू, आ. कपिल पाटील, आयुक्त अजय मेहता, उपमहापौर अलका केरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)