शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे भारत संकटात - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 7, 2015 13:58 IST

भाजपाने पीडीपीसोबत जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ७ - भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घ्यावा लागतो म्हणून भाजपाने भारतविरोधी सईद यांच्याशी हातमिळवणी केली असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला आहे. 
जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेविषयी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला फटकारले आहे. जम्मू काश्मीरमधील निवडणुकीसाठी पाकिस्तान व दहशतवाद्यांना श्रेय देत सईद यांनी सर्वांचा अपमान केला असून अफझल गुरुचे अवशेष मागून पीडीपीने देशद्रोहाचा कळसच गाठला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.  श्याम प्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू जम्मू काश्मीरमध्ये झाल्याची आठवण करुन देशभक्त मोदींनी काश्मीरप्रश्नी तडजोड करु नये अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.