शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

By admin | Updated: May 12, 2016 09:13 IST

भानगडी व उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही, ज्यांनी शिखरावर बसवले तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 -  भानगडी व उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही. ज्यांनी शिखरावर बसवले तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर सोडले आहे. हूकुमशहा हिटलरचाही गर्व, अहंकार गळून पडला व अंधार्‍या खंदकात त्याला स्वत:वरच गोळी झाडावी लागली. म्हणून लोकशाहीचे महत्त्व समजून वागा. जनतेने राज्य करण्यासाठी हाती दुधारी तलवार दिली आहे. या तलवारीने स्वत:चेच नाक कापू नका! उत्तराखंडात तसेच घडले आहे असेही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुनावले आहे.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे व त्यानंतर शक्तीपरीक्षेत काँग्रेसचा झालेला विजय व भाजपाचा पराभव या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टीका करत त्यांना सल्ला दिला आहे. उत्तराखंडला देवभूमीचा दर्जा आहे. त्यामुळे राजकीय शक्तिपरीक्षणाच्या निकालात कोण जिंकले व कोण हरले यापेक्षा लोकशाहीचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षाला विजयाच्या तुतार्‍या व ढोल वाजविण्याची संधी मिळाली. उत्तराखंडवर घिसाडघाईने राष्ट्रपती राजवट लादून ‘शक्ती’ दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते स्वत: उताणे पडले. पण काँग्रेसला ‘टॉनिक’ मिळाले याचे आम्हाला दु:ख आहे असं उद्धव ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे. 
 
फाटाफूट व त्यानंतरच्या तोडबाज्या हा आपल्या लोकशाहीला लागलेला रोग आहे. या रोगावर उपचार करण्याचे सोडून डॉक्टर व वैद्य मंडळी आजार पसरवण्यासाठी शर्थ करताना दिसतात तेव्हा देशाच्या भविष्याविषयी चिंता वाटते व देशात अराजक, आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होईल की काय याची भीती वाटते. काँग्रेस राजवटीत अशा घटना घडत होत्या म्हणून ज्यांनी लोकशाही व राजकीय साधनशूचितेच्या नावाने गळा काढला तेच लोक सत्तेवर येताच काँग्रेसच्या वरताण वागू लागले. प्रभू श्रीरामाने रावणाची व कृष्णाने कंसमामाची भूमिका करावी असेच घडत आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
सामना संपादकीयमधील इतर मुद्दे - 
- उत्तराखंडात काँग्रेसचे नऊ आमदार फुटले व सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत बहुमताची परीक्षा तेव्हाच झाली असती तर काँग्रेसचे सरकार पराभूत झाले असते. पण नाना खटपटी लटपटी करून सत्तेचा दबाव टाकून बहुमताची परीक्षा टाळण्यात आली व राष्ट्रपती राजवट लादली गेली. जणू लोकशाहीला दंडबेड्या लावून जखडून ठेवले. 
 
- भारतीय जनता पक्षाची यात पूर्ण नाचक्की झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने हे सर्व घडले असेल तर देशाची जनता त्यांना कोपरापासून दंडवत आताच घालीत आहे. 
 
- देश काँग्रेसमुक्त करण्याची ही पद्धत नव्हे. हीच पद्धत स्वीकारली जाणार असेल तर देशात सरळ हुकूमशाहीच लादली जाईल व लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे जोरजबरदस्तीचा अवलंब करून गाडली जातील. हे चित्र भयंकर आहे. 
 
- बिहारात राष्ट्रपती शासन लावा, अशी मागणी आता भाजपच्या गोटातून सुरू आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस व जवान मरत आहेत व कश्मीर खोर्‍यातील स्थिती हाताबाहेर आहे. केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकारही बरे चालले नसल्याची बोंब भाजपवाले मारीत आहेत. मग येथेही राष्ट्रपती शासन लावून राज्य करण्याची इच्छा बाभळीचे झाड फुटावे तशी फुटली आहे काय? 
 
- लोकशाहीत लोकांचेच ऐकायचे असते. फक्त सत्ता चघळत बसायची म्हणून लोकशाही नको. आज देशाचा कारभार जणू न्यायालयेच चालवत आहेत व याला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. उत्तराखंडमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप राज्यकर्त्यांच्या चुकांमुळे झाला. न्यायालयासही पायघड्या आपण अंथरल्या, पण शेवटी न्यायालयाने लोकशाहीचे रक्षण केले हे महत्त्वाचे