शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

दुष्काळग्रस्तांसाठी दोन महिन्यांचा पगार

By admin | Updated: September 16, 2015 00:26 IST

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. २०, २१ आणि २२ सप्टेंबरदरम्यान ते दुष्काळी दौऱ्यावर जात असून, उस्मानाबाद येथील दुष्काळ परिषदेने या दौऱ्याची सांगता होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या मुंबई व कोकणातील पाणी दुष्काळी प्रदेशांमध्ये वाहून नेण्याची आवश्यकता आहे. तसा आराखडा बनविण्याची मागणी १५ वर्षांपासून करत आहोत; मात्र केंद्र व राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मात्र आता विरोधी बाकांवर बसायची वेळ आल्यावर ते मागणी करीत आहेत. त्यांनी सिंचनाचे क्षेत्र वाढवले असते तर दुष्काळाशी चांगला सामना करता आला असता, असा टोलाही आठवले यांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीकडे राजकीय नजरेने पाहण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. सढळ हस्ते मदत करावी तीन दिवसांच्या दौऱ्यात मी सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांना भेटी देणार आहे. उद्योगपती, बॉलीवूड क्षेत्रातील व्यक्ती व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी. - आठवले