शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निकामी दारुगोळ््यांच्या स्फोटात दोन ठार

By admin | Updated: October 22, 2014 05:48 IST

लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.

अहमदनगर : लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.सुभाष दामू निकम (४०) व गणेश शिवाजी गायकवाड (४२) अशी मृतांची नावे असून दोघेही खारकर्जुने येथील रहिवासी आहेत. अहमदनगर तालुक्यातील खारे कर्जुने (के. के.) रेंजमध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर लष्करी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाचा तपास सुरू झाला आहे.नगर तालुक्यात खारे कर्जुने शिवारात आशिया खंडातील सर्वात मोठे लष्कराच्या युद्ध सरावाचे क्षेत्र आहे. या लष्करी हद्दीत नेहमीच युद्धाचा सराव केला जातो. त्यामुळे सरावादरम्यान तोफगोळे डागले जातात. त्यानंतर निकामी झालेले तोफगोळे, दारुगोळ््यांचे भंगार गोळा करण्यासाठी अनेक जण जीवावर उदार होतात. खारे कर्जुने ते भाळवणी या रस्त्याजवळून ही हद्द जाते. युद्ध सरावाच्या क्षेत्रालगत दगडांच्या भिंती ओलांडून अनेक जण डागलेले तोफगोळे, दारुगोळे घेण्यासाठी जातात. या भंगार विक्रीतून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. निकामी झालेला तोफगोळा हाताळताना येथे अनेकवेळा दुर्घटना घडल्या असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. निकामी तोफगोळे हाताळत असतानाच स्फोट झाला. त्यात गंभीर जखमी होवून दोघांचा मृत्यू झाला. भानुदास गोपाळराव गायकवाड यांच्यासह दोन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)