शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

हरविलेल्या दोन मुली वाराणसीत सापडल्या!

By admin | Updated: April 29, 2016 06:06 IST

नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हरविलेल्या तीन मुलांपैकी दोन मुली वाराणसीत सापडल्या आहेत. आंटी म्हणून बोलत असलेल्या या महिलेसोबत तीन चिमुकले मुंबईहून वाराणसीत पोहचले. त्यानंतर ४ वर्षीय मुलासोबत ती निघून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. त्यामुळे या संशयित आंटीच्या मागावर सध्या पोलीस आहेत. नागपाडा नयानगर येथून २१ ते २४ एप्रिलदरम्यान तब्बल चार मुले बेपत्ता झाली. यापैकी २४ तारखेला खेळता खेळता एकाच वेळी तरन्नुम खासुल (६), गुलफाम खासुल (४) आणि कुलसुम खान (६) तिघेही गायब झाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा याचा अधिक तपास करत असताना गुरुवारी यापैकी दोन मुली वाराणसीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या त्या अस्मिता चाईल्ड लाइन संस्थेच्या ताब्यात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास वाराणसीत दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत फिरतअसताना एका हवालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. चौकशीत त्या मुंबईहून एका महिलेसोबत आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस हवालदाराने त्या मुलींना तत्काळ अस्मिता चाईल्ड लाइफ संस्थेच्या ताब्यात दिले. त्यांनी केलेल्या चौकशीत त्या दोघी तरन्नुम आणि कुलसुम असल्याची माहिती समोर आली. संस्थेकडून गुरुवारी याबाबत माहिती मिळाली असून, शुक्रवारी पहाटेच्या टे्रनने पोलिसांचे पथक तेथे रवाना होणार असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शिवाजी कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)