शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 21, 2015 00:58 IST

सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारंजा तालुक्यातील चिंचोली येथील रुपचंद डोंगरे

कारंजा : सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कारंजा तालुक्यातील चिंचोली येथील रुपचंद डोंगरे (५८) यांनी गळफास लावून, तर मोरांगणा येथील मंगेश दौलत भजभुजे (२७) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब सोमवारी उघडकीस आली. रुपचंद यांनी बँकेचे १० लाख ६७ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. यापैकी कृषी पीककर्ज १ लाख १ हजार ५५७, तर शेतीपयोगी उपकरण ट्रॅक्टरचे ९ लाख ६६ हजार ८५ रुपये कर्ज थकीत असल्याची माहिती आहे. कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.मंगेश यांचा सोमवारी पहाटे सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. त्याच्यावर बँकेचे ८५ हजार रुपये व उसनवारीचे असे एकूण तीन लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले होते. (प्रतिनिधी)